विरोधक संविधानाविषयी अपप्रचार करून सत्तेवर बसण्याचे स्वप्न पाहत आहे – आमदार नामदेव ससाने

सिध्दार्थ दिवेकर
उमरखेड :- (दिनांक २७ ऑगस्ट) ३६ राज्यांना एकसंघ करण्याचे काम भारतीय संविधानाने केले असून विविध जाती ,धर्म, पंथ , लिंग यांना एकत्र बांधले आहे.
काही लोक संविधानाचा अपप्रचार करून संविधान बदलणार असल्याची भाषा करित लोकांची दिशाभूल करून मते मिळवून सत्तेवर बसण्याचे स्वप्न पाहत असल्याचे प्रतिपादन आमदार नामदेव ससाने यांनी केले.
संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजीत “संविधान जागर यात्रेचे” स्वागत करतांना स्थानीक राजस्थानी भवन येथे आयोजीत कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
मंचावर यावेळी संविधान समितीचे विजय गव्हाळे, योजना ठोकळे, स्नेहा भालेराव, राजेंद्र गायकवाड, नागसेन पुंडगे, वाल्मीक निष्काळजे आदि उपस्थित होते.
दरम्यान शहरात संविधान जागर यात्रा दाखल होताच कार्यकर्त्यांनी शहरातून मोटर सायकल रॅली काढुन स्वागत केले. संविधानाचा उपयोग राजकारणासाठी करीत विरोधकांनी संविधान बदलणार म्हणून अपप्रचार केला.
केवळ राजकारणापोटीच भाजपावर व नरेंद्र मोदी यांचेवर खोटे आरोप करणे हे खुप गंभीर व दुदैवी आहे. अशा खोट्या लबाड लोकांच्या बोलण्याला सुज्ञ जनता आता यापुढे कधीच बळी पडणार नाही याचा विश्वास व खात्री असल्याचे यावेळी आमदार नामदेव ससाने यांनी सांगीतले.
यावेळी विजय गव्हाणे बोलतांना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांवर संविधान, लोकशाही, स्वातंत्र व देश/राष्ट्र जपण्याची व टिकुन ठेवण्याची तसेच राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जबाबदारी दिलेली आहे. ती सर्वांनी जाणीवपुर्वक व गांभीर्याने पार पाडावी.
कुठल्याही अपप्रचाराला थारा जनतेंनी देवू नये असे आवाहन केले. यावेळी योजना ढोकळे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात यावेळी पांडुरंग आठवले, प्रा.अनिल काळबांडे, पत्रकार दत्तात्रय काळे, राजु गायकवाड, सुभाष दिवेकर, माजी डी वाय एस पी मुंबई), पत्रकार सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना), सुधाकर कांबळे, रमामाता महिला मंडळ, शुभम भिमराव इटकरे व युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला एसीपी अजय बाबाराव इटकरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन भाजपा शहर अध्यक्ष प्रकाश दुधेवार यांनी तर आभार आनंदीदास पाळेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला अनेक संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.