Uncategorized

उमरखेड तालुक्यातील रस्ते खड्डयात, शासन-प्रशासन बघ्यांच्या भूमिकेत

रस्त्याची चाळण; विकासाची वाट

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

उमरखेड : तालुका भरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, सर्वत्र धुळीचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शासन व प्रशासनिक उत्तरदायित्व नावाचा प्रकार नावालाही शिल्लक नसल्याचे दिसत आहे. जनतेला मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याने, लोकांमध्ये कमालीची निराशा ओढवली गेली आहे.

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याच्या सीमावर्ती भागातील उमरखेड तालुक्याची दळण वळणाची व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. शहरातून जाणाऱ्या ढाणकी रस्ता हा तालुक्यातील प्रमुख वसाहती असलेल्या मतखंड, ढाणकी, फुलसावंगी व बंदी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जाणारा मुख्य रस्ता आहे. मात्र, या रस्त्याची अक्षरशः जागून जागी झालेली चाळण अतिशय चिंताजनक आहे. त्याच प्रकारे पुसद मार्गावरील मुळा व पोफळी या भागातील रस्त्यांची ही अक्षरशः चाळणी झालेली असताना, याबाबत असलेली शासन व प्रशासनाचे उदासीनता जनतेच्या डोळ्यात पाणी आणत आहे. एकंदरीत तालुकाभरातील प्रमुख बाजारपेठा ते खेड्यापाड्यांच्या रस्त्याची झालेली दयनी अवस्था अतिशय चिंताजनक आहे. यासाठी शासनाकडून कोट्यावधीचा फंड ही आल्याच्या वार्ता कानी पडत आहेत. मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कॉलिटी वर त्या कोट्यावधीचा कुठलाही फरक पडताना

दिसत नाही. नागरिक, विद्यार्थी यांना येजा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही सर्व परिस्थिती उघड्या डोळ्यांनी जबाबदार शासन व प्रशासन मात्र डोळे बंद करून झोपेचे सोंग घेत आहे का, हा प्रश्न जन सामान्यांना व्याकुळ करणारा बनत चालला आहे. बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम, या विभागातील अधिकाऱ्यांची असवेदनशीलता व बेजबाबदारपणा अजून किती काळ जनतेने सोसायचा हा ही यक्ष प्रश्न बनला आहे. तसेच यावर अंकुश ठेवणारी व्यवस्था ही बोथडझाल्याची प्रचिती जनसामान्यांना येत आहे. याबाबत अनेक माध्यमांनी अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध करून सुद्धा, यावर चोप लावणारे कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत ते सर्वांचाच बेजबाबदारपणा जनतेला आणखी किती काळ सहन करावा लागेल हे बघावे आहे. चौकट अपघाताचे लागणार प्रमाण वाढले तालुकाभरातील झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज कुठून कुठंतरी छोटा मोठा अपघात घडून येत आहे. यजा करणारे वाहनधारक खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना दिसत असले तरी खड्ड्यांच्या निर्माण झालेल्या श्रृंखलेमुळे आणि कोळी अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे पाठीच्या मणक्याचे आजार सोपवत आहेतच, शिवाय धुळीमुळे शासनाचे आजार बळावत असल्याची धक्कादायक बाब समोर येताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!