Uncategorized

करंजी पाणी समस्या त्वरीत सोडवा साहेब…!

(ग्रामपंचायत सदस्यांचे उमरखेड पं.समीतीच्या बि.डी.ओ ला साकडे)

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

ढाणकी – (दि. 15 जानेवारी)
उन्हाळयातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आता पासूनच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करण्याऐवजी उपलब्ध असलेली पाणी पुरवठा करणारी यंत्रणाच बंद अवस्थेत असल्यामुळे पाणी पुरवठा करणारऱ्या विहरीला मुबलक पाणी साठा असून देखील करंजी वासीयांचा पाण्या विणा घसा कोरडा पडत आहे.

अशी दुर्दैवी वेळ ग्राम पंचायतच्या वेळ काढू धोरणामुळे गावकऱ्यांवर येत असल्याची कैफीयत ग्राम पंचायत सदस्यांनी उमरखेड पंचायत समिती कार्यालयात बिडीओच्या दालणात धाव घेतली आहे.

परिस्थीती आणि पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून संबंधीत ग्राम पंचायतचे ग्रामसेवक दयानंद दोडके यांना पत्राव्दारे पाणी टंचाई त्वरीत दुर करण्यासाठी वेळीच उपाययोजना करा अशा आदेशाचे पत्र काढण्याच्या सुचना पंचायत विभागाला देत त्या सेाबत स्थानिक नागरीकांना जन्म नोद, मृत्यू नोंद व इतर ग्राम पंचायतच्या अत्यारीत दस्तऐवज नागरीकांना वेळेत उपलब्ध व्हावेत या दृश्टिने ग्रामपंचायत बोर्डावर ग्राम सेवकाच्या भेटीच्या दिवसाचे फलक लावण्याच्या सूचना पत्रात नमुद करण्याचे सांगीतले.

सन 2015 ते 2020 च्या पंचवार्शीक वर्शात गावाला कायम स्वरूपी व दिर्घ स्वरूपाची पाणी पुरवठा योजना 43 लाख रू.खर्च करून खनी कर्म योजनेतंर्गत मंजुर होवून तिचे काम पूर्ण झालेत त्यामध्ये नविन वीहीर ,गावात पाण्याचे टाके,व पाण्याच्या विहरीपासून टाक्यापर्यंत जल वितरण व्यवस्था निर्माण केली.

मात्र 3 वर्श उलटून देखील गावकरी यांना पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळत नाही.तसेच 2021 मध्ये प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने अंतर्गत अंदाजे 2 ते 3 लाख रू.खर्ची घालून गावकरी यांना सुध्दा व मुबलक पीण्याचे पाणी मिळण्यासाठी अॅरो प्लांट उभारण्यात आला परंतु तोही बंद अवस्थेत असल्यामुळे धुळ खात पडून आहे.

आज मितीला गावकरी षेतकरी यांच्या वैयक्तीक वीहीरीवरून 2 कि.मी.ची पायपीट करून आपली तहाण भागवत आहे.

2002 पासुन जुनी विहीर व लघु नळ योजना कार्यन्वयीत होती मात्र विज जोडणीचे कारण पुढे करून ग्राम पंचायत प्रषासन नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.

उन्हाळयाच्या सुरूवातीलाच यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे हातपंपाच्या पाणी पातळीने तळ गाठले.
त्यामुळे काही हातपंपावर अवलंबुन असलेल्या गावकरी यांची रात्री बे रात्री पाणी भरतांना मोठी दमछाक सूरू आहे.

अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा गट विकास अधिकाऱ्यांसमोर ग्राम पंचायत सदस्य अरूण घुगरे यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते राहूल गायकवाड, सा.का.मसाजी भालेराव यांनी वाचून दाखवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!