अपघात : दोन विद्यार्थी ठार अपघातानंतर अज्ञात व्यक्तीने मृतदेह नालीत फेकल्याने घातपाताचा संशय

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
मित्राच्या वाढदिवसाचे जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोन दिवस विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात त्यांचा दोघांचा मृत्यु झाला आहे अपघातानंतर अज्ञात व्यक्तीने मृतदेह व दुचाकी महामार्गालगत असलेल्या नाली मध्ये टाकल्याने अपघात नसुन घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

महागाव तालुक्यातील वाकोडी येथील अर्जुन गजेंद्र देशमुख (वय १९वर्षे) व अजय सतीश विरखेडे (वय २२वर्षे) हे विद्यार्थी दिनांक १७जानेवारी रोज शुक्रवार रोजी आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जेवणाच्या पार्टीसाठी नांदगव्हाण येथील जगीरा धाब्यावर गेले होते. जेवण करून घरी परत येत असताना नागपुर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते मुडाणा दरम्यान असलेल्या लुटे यांच्या शेताजवळ मध्यरात्री नांदेड कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराचीधडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने अपघात कर्त्या वाहनातील अज्ञात व्यक्तीने दोन्ही युवकांचे मृतदेह व दुचाकी काही अंतरावर नालि मध्ये टाकून घटनास्थळावरून पोबारा केला. ही घटना आज दिनांक १८जानेवारी रोज शनिवार ला सकाळी शेतात गेलेल्या

शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याची माहिती महागाव पोलीस व नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी व महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
चौकट
नातेवाईकांनी व्यक्त केला संशय
मृतदेह अपघातस्थळावरून महामार्गालगत असलेल्या शेतातील नाल्यात टाकण्यात आल्याने शंकेला वाव निर्माण झाली असुन हा अपघात नसुन घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे असून या घटनांमुळे महागाव तालुक्यात शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसापासून तालुक्यात अपघाताच्या घटनेत मोठी वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे