महागाव तालुक्यात अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित!

कृषी सहाय्यक अनुदान टाकण्याकरता शेतकऱ्याची आर्थिक लूट करत असल्याचे बोलले जात आहे. 30 मे रोजी जिल्हाधिकारी यांची महागाव तहसील ला भेट! महागाव वार्ताचे संपादक विजय सूर्यवंशी यांनी मांडल्या तालुक्यातील समस्या!
महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात 2023 24 मध्ये महागाव तालुक्यात ढगफुटीमुळे गावातील नागरिकांना हेलिकॉप्टरने काढण्याची वेळ आली होती .त्या काळात शेतकऱ्याची अतोनात नुकसान झाले .नदी काठावरील सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्या टायमाला पंचनामे करण्यात आले होते .परंतु खर्डी चे पैसे मिळाले नाही 2023 24 च्या काळातील खर्डी चे पैसे टाकण्याकरता कृषी सहाय्यक व तलाठी शेतकऱ्याची पिळवणूक करत आहे . नदी व नाल्या काठावरील शेतकऱ्यांचे नुकसान शंभर टक्के झाले असताना त्यांना शंभर टक्के रक्कम न टाकता थातूरमातूर रक्कम टाकत असल्याचे शेतकरी बोलत आहे. अतिवृष्टी व मुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्याला पूर येऊन शेतात पाणी गेल्यामुळे हातात तोंडाशी आलेला खरीप हंगामातील सोयाबीन कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला होता .नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या देखील तयार करण्यात आल्या परंतु महागाव तालुक्यात केवळ मोजक्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पोर्टल द्वारे अनुदान रक्कम जमा झाली.
परंतु यातून हजारो शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत .महसूल विभाग व कृषी विभागाने संयुक्त याद्या जाहीर करून शेतकऱ्यांनी आपल्या खात्याशी केवायसी करावी अशी शेतकऱ्यांना सुचवले होते .त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची केवायसी देखील केली पण काही शेतकऱ्याचे आधार अपडेट व केवायसी असल्यामुळे अनुदानाची रक्कम जमा झाली नाही .तसेच चार ते पाच दिवसापासून पोर्टल बंद झाल्यामुळे अजूनही अतिवृष्टीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी बी बियाणे रासायनिक खते यासाठी अनुदानाची रक्कम कमी येईल असे अशा शेतकऱ्यांनी निर्माण झाली होती. नदीकाठच्या व नाल्याकाटश्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना ठुट पुंजी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली त्या शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांना ठराविक रक्कम देऊन मोठ्या रकमा स्वतःच्या खात्यात जमा केल्याचे आढळून आले. मोरत येथील एडवोकेट विवेक देशमुख यांच्या आजूबाजूच्या शेतात खरडून गेल्याच्या रकमा टाकण्यात आल्या परंतु मध्यभागी देशमुख यांच्या शेतात कोणतीही रक्कम टाकण्यात आली नाही . त्यांनी तशी लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी यांना दिली आहे .उर्वरित व अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे वाऱ्यावर सोडले की काय?, असा प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे . जवळपास 35000 हेक्टर शेत जमीन चे नुकसान झाल्याचे दिसून आले वैयक्तिक लाभार्थ्यांना 30 एप्रिल पर्यंत अनुदानाची रक्कम वितरत करू परंतु निधी प्राप्त नसल्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहिले याबाबत महसूल विभागाकडे विचारणा केली असता लवकरच शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची अनुदान जमा केले असे सांगण्यात आले ,परंतु जनतेने शेतकऱ्याचे नुकसान भरपाई अनुदानाची वितरण करून उर्वरित व अनुदानापासून वंचित राहिले ते शेतकरी कायमची ठेवल्या जातील की काय? अशी शंका शेतकऱ्यांवर उपस्थित केले जात आहे. पहिले महागाव तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केले आहे .शासनाच्या कोणत्याही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही ही वस्तुस्थिती आहे कृषी विभाग शेतातील बांध लेव्हलिंग करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे .ते शेतकऱ्यापर्यंत कोणतेही योजना पोचू देत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये हजर नसल्यामुळे पांदन रस्त्याचे प्रश्न असे अनेक अडचणी निर्माण झाले आहे. तालुका लेवल व सर्व अधिकाराचा समतोल दिसत नाही कोणतेही नियोजन नाही. अधिकारी कार्यालयात हजर राहत नाहीत ते उमरखेड पुसद यवतमाळ वरून अपडाऊन करतात अशा परिस्थिती अचानक ऑफिस टाईमला उंबरखेड महागाव मतदार संघाचे आमदार यांनी नुकतीच तहसील कार्यालयामध्ये भेट दिली असता कृषी विभाग महसूल विभागाचे सर्व कर्मचारी गैरहजर असल्याचे चित्र दिसून आले शेतकऱ्यांची काम होत नसल्यामुळे वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या आमदार यांनी जिल्हाधिकारी व शासनाकडे अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करून शेतकऱ्याला लोकांना न्याय मिळेल अशी कारवाई करावी असे कळले होते .दिनांक 30 मे रोजी जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयात भेट दिली असता शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या कृषी विभागातील कोणती अधिकारी हजर नव्हते .पांदण रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले नाही रेड झोनमधील बोगस लेआउट प्रकरण तसेच नियमबाह्य केलेले फुलसांगी येथील येणे पे 36 राठोड यांनी बेकायदेशीर केल्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी ते रद्द केले पण त्यांच्यावर कारवाई झाली नसल्यामुळे महागाव वार्ता चे संपादक विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी साहेब त्यांच्याकडे तक्रार मांडली त्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी यवतमाळला ऑफिसला या व चर्चा करून कारवाई करू व शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत व सर्व तक्रारी कागदपत्र घेऊन या, अशी चर्चा केली त्यामुळे लवकरच शेतकऱ्याचे प्रश्न व तक्रारीचे निवारण केल्या जाईल, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल , शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील असे जिल्हाधिकारी साहेबांच्या व संपादकाच्या बोलण्यातून दिसून आले.