Uncategorized

डॉ . अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी भारतरत्न पुरस्कार जाहिर करा !

आजाद समाज पार्टीची मागणी :

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

जगविख्यात साहित्यरत्न डॉ . अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीदिनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे आजाद समाज पार्टीने आज दिनांक ३१ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत केली आहे .
दलित , पिडीत, कष्टकरी कामगार यांच्या व्यथा आणि त्या व्यथांच्या कथा लिखानाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर मांडणारे थोर साहित्यरत्न , साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमीत्त त्यांनी केलेल्या देश हिताच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देवुन गौरव करण्यात यावा अशी आजाद समाज पार्टी यवतमाळ यांनी मागणी केली आहे . हि मागणी
आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे , जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर यांच्या नेतृत्वात निवेदन देवुन करण्यात आली . यावेळी सुशांत धोंगडे , धम्मपाल गायकवाड , समाधान राऊत, गोलु मुनेश्वर, विनोद बर्डे, विष्णू वाडेकर, माधव नवसागरे, आशिष काळबांडे, हर्षदीप काळबांडे, रविंद्र हापसे संभाजी हापसे, प्रतीक धोंगडे मुजीब लाला, विकास काळबांडे शुद्धोधन निखाडे,उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!