रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू – वाढीव मोबदला त्वरित द्यावा : अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:-२०१८-१९ या कालावधीत तालुक्यातील रेल्वे – प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शेतजमीन – भूसंपादित करून शासकीय मोबदला – देण्यात आला. परंतु, शेतातील पाईपलाईन, – विहीर, बोरवेल, फळझाडे व इतर – साहित्यांचा शासकीय मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही. प्रशासनाने त्वरित – शासकीय माध्यमातून स्थळपाहणी करून – मोबदला देण्याची मागणी वारंवार करूनही – वाढीव मोबदला न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष उपोषणकर्ते संजय बिजोरे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवार दि. २२ – जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले.
उमरखेड तालुक्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्त – शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत मनसे – शहराध्यक्ष संजय बिजोरे पाटील हे मागील २०१८ ते २०२४ पर्यंत सतत तालुक्यातील – शेतकऱ्यांच्या समवेत शासन दरबारी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार,खासदार यासह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन चर्चासुद्धा केल्यात.
परंतु, आजपर्यंत मोबदला प्राप्त झाला नाही. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी सदर विषयी तत्काळ मार्गी लावू असे लेखीस्वरूपात पत्र दिल्यानंतरही शेतकऱ्यांना भूसंपादित जमिनीतील साहित्यांचा मोबदला मिळाला नाही. पुढील हंगामाची पेरणी करू नये, असा आदेश देण्यात आला आहे. परंतु, आज शेतात ऊस, कापूस इत्यादी पिके उभी आहेत.
चौकट
वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय
- २०९८ पासून आजपर्यंत आमच्या परिसरातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रशासकीय व लोकप्रतिनिधींना निवेदने व चर्चा करूनही निर्णय लागला नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही निर्णय घेतला नसून लोकशाही मागनि आमरण उपोषण करीत आहे.- संजय बिजोरे पाटील, अध्यक्ष, रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी समिती.