पत्रकार निखील वागळे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संद्याच्या वतीने गृहमंत्र्याकडे निवेदनातून मागणी
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड :
राष्ट्र सेवा दलाने ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर पुण्यात हल्ला करण्यात आला व गाडीच्या काचा फोडण्यात आल्या हा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करुन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावा यासाठी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने उपविभागीय महसूल अधिकारी यांच्यामार्फत दि 12 रोजी गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, दि ९ फेब्रुवारी रोजी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲड.असिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असतांना हल्लेखोरानी अतिशय क्रुरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत स्वतःचा व वरील व्यक्तींचा बचाव केला. या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील पत्रकार करत आहेत. त्याचप्रमाणे दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. सोबतच राज्यात कुठेही लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाची कुठेही गळचेपी होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत नंदनवार , सचिव अरविंद ओझलवार , प्रशांत भागवत ,साहेबराव धात्रक अंकुश पानपट्टे ,शैलेश ताजवे ,अजय कानडे ,व्यंकटेश पेन्शनवार ,वसंत देशमुख, नीळकंठ धोबे ,अविनाश मुन्नरवार, रवि भोयर, ताहेर मिर्झा, सलमान अशहर खान ,आझहरुल्ला खान, अरुण बेले , डॉ विशाल माने ,गजानन भारती ,संजय देशमुख ,सागर शेरे, शिवचरण हिंगमिरे आदीं उपस्थित होते .