विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी. भा.वि.मो. ची मागणी.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
भारतीय विद्यार्थी मोर्चा यवतमाळ च्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संविधानातील तरतुदीनुसार सर्व समाजघटकांना शिक्षण घेता यावे. अर्थिक सहाय्य म्हणून शिष्यवृत्ती योजना योजना शासनाकडून राबविली जाते. त्यानुसार शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेकरीता पात्र असणारे गरजु विद्यार्थीच शिष्यवृत्ती मिळण्याकरिता आपल्या महाडिबीटी पोर्टल वर अर्ज करीत असतात. ज्यांना शिष्यवृत्ती नको ते अर्जच सादर करीत नाहीत.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाला Right to give up हे बटण प्रासंगिक नसुन तशा प्रकारची मागणी कोणत्याही विद्यार्थी संघटनांनी आजतागायत केलेली. त्यामुळे गरीब,गरजु, होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता ज्या ज्या विद्यार्थ्यांकडून संभ्रमावस्थेमध्ये महाडिबीटी पोर्टल वर चुकीने Right to give up केल्याने शिष्यवृत्तीचा अर्ज रद्द झालेला आहे. त्यांना पुन्हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटनेने केली आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी अविनाश चंद्रवंशी (भारतीय विद्यार्थी मोर्चा), कुणाल कोवे,राजदिप कांबळे,गौरव गेडेकर,साक्षी पाडसे,हर्षदा मंदीलकार,सुवर्णा शेंगोळे,उमा टेकाम,रविना आत्राम आदी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.