सामाजिक

कुरोळी गावातील 340 कुटुंबाच्या आमरण उपोषणाला आजचा 3 रा दिवस उजाडला,,,,

आम्हाला न्याय मिळाला नाही तर येत्या 26 जानेवारीला उपोषण कर्ते महिला व पुरुष जलसमाधी घेणार असे ठाम मत

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

कुरुळी हे गाव उमरखेड तालुक्यात बंदी भागात आहे. येथील नागरिक गुण्या गोविंदाने शेतीच्या भरवशावर उदरनिर्वाह करत होते. परंतु 1998 / 99 ला शासकीय धोरणामुळे अमरापूर जल प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. व 750 हेक्टर ओलीती जमीन या जलप्रकल्पात सामावून घेण्यात आली आहे. व कुरूळी येथील शेतकऱ्यांना 20,000 प्रमाणे कोरडवाहू तर ओलीती जमीन 25,000 हजार देणार असे सांगण्यात आले होते. अमडापूर जल प्रकल्पासाठी शासनाने व पाटबंधारे विभागाने काही थोडेसे पैसे देऊन कुरोळी येथील असाह्य शेतकऱ्यांच्या 750 हेक्टर जमिनी ताब्यात घेऊन जल प्रकल्प तयार केला आहे. आज या गोष्टीला वीस वर्षे होऊन गेले परंतु शासनाने किंवा पाटबंधारे विभागाने आज पर्यंत या शेतकऱ्यांना शेतीच्या मोबदल्याचे रुपये किंवा पुनर्वसन केले नाही. त्यामुळे आमच्यावर आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. करिता संविधानिक पद्धतीने आमरण उपोषण करून शासनाला जाग आणण्याकरिता हा शेवटचा मार्ग आम्ही हाताळला आहे. व आमरण उपोषणाच्या माध्यमातून आमचे प्रश्न प्रशासनाने सोडवले नाही तर येत्या 26 जानेवारीला 340 परिवारातील महिला पुरुष जलसमाधी घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहे. असे प्रखर मत उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे. आमच्या जमिनीची खाजगी किंमत 20 लक्ष असून 50 लक्ष हेक्टरी आहे. परंतु शासनाने व पाटबंधारे विभागाने हेतूपरस्पर आमची दिशाभूल करून आमच्या जमिनी ताब्यात घेऊन आम्हाला व आमच्या परिवारांना देशोधडीला लावले आहे. असा आरोप ऊपोषणकर्त्यांचा आहे.2003/2004 या साला मध्ये अमडापूर जलप्रकल्प पूर्ण होऊन पाण्याने तुडुंब भरला होता. त्यामुळे जंगलातील प्राणी व आजूबाजूचे शेतकरी आबाद झाले. परंतु ज्या 340 शेतकऱ्यांची जमीन या जल प्रकल्पात गेली यांच्याकडे शासनाने व राजकीय पुढारी नेत्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे 340 परिवार दरिद्री, लांच्यारी सहन करूनआमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडे वारंवार कागदोपत्री पाठपुरावा करूनही आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे आम्ही 340 परिवारातील महिला व नागरिक ऊ पोषण करत असल्याची माहिती अमरण उपोषण कर्त्यांनी दिली आहे. संविधानिक पद्धतीने गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलो आहे. परंतु आजपर्यंत शासनाकडून किंवा राजकीय पुढार्‍याकडून आमच्या रास्त मागणी विषयी कोणीही सांत्वन पण केले नाही. असे म्हणणे समस्त उपोषणकर्ते गयावया करून सांगत होते.
शासनाने व राजकीय आमदार, खासदार यांनी आमच्या रास्त मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येत्या 26 जानेवारी रोज शुक्रवारी गणराज्य दिवसाचे औचित्य साधून जलसमाधी घेणार आहोत असे उपोषणास बसलेल्या सर्वच नागरिकांनी व महिलांनी नाविलाजाने बजावून सांगितले आहे.
गेल्या वीस वर्षापासून या 340 परिवाराची पीळवणूक शासन करीत आहे. व आमच्या परिवाराचे उदरनिर्वाह करणारा एकमेव शेती व्यवसाय त्यांनी आमच्याकडून जाणीवपूर्वक घेऊन आम्हाला कोणताही रोजगार नसल्याने आमचे जीवन जगणे अशक्य झाले आहे. करिता प्रशासनाने लवकरात लवकर अमडापूर जल प्रकल्पामध्ये गेलेल्या जमीनदारांच्या रास्त मागण्या पूर्ण करून घ्यावा. अशी मागणी गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले कुरोळी या गावातील 340 परिवारातील नागरिक व महिला करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!