कृषिकन्यांनी केले झायगोग्रामा भुंग्याद्वारे गाजर गवताचे निर्मूलन

उमरखेड: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित,
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
कृषी महाविद्यालयातील, उमरखेड येथील सातव्या सत्राच्या कृषिकन्या अनुश्री पंडागरे, ऋतुजा वाघमारे, राणी बुधे , गायत्री भोयर, अनुश्री अंगलवार आणि श्रेया वेळुकर यानी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामीण स्तरावर झायगोग्रामा भुंग्याद्वारे गाजर गवताचे निर्मूलन केले. गाजर गवताने भारतातील सुमारे 35 दशलक्ष हेक्टर जमिनीवर आक्रमण केले आहे. गाजरगवत हे एक विषारी, त्रासदायक, एलर्जीक आणि आक्रमक तण आहे जे मानवी जीव आणि जीवितहानीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे गाजर गवताचे निर्मूलन करणे आवश्यक असते . प्रात्यक्षिकास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विषयतज्ज्ञ मा. एस. के. चिंतले सर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख मा. वाय. एम. वाकोडे सर,सानिका शृंगारे, जया धरणकर, सुषमा भिसे , समृद्धी शेळके, भाग्यश्री काळे, पूजा जाधव या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. या साठी गावकऱ्यांची मोठी उपस्थिती नोंदवली.
