योग्य नियोजनासाठी आ. किसन वानखडेंचा विधानसभेत प्रश्नइसापूर प्रकल्पाचे पाणी पैनगंगेच्यापात्रात सोडा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : इसापूर धरणाचे पाणी
पैनगंगा नदीपात्रासह कालव्याव्दारे सोडण्याचे योग्य
नियोजन नाही. हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने नदीकाठच्या
गावांना पाणीप्रश्नाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे
नदीपात्रात पाणी सोडण्याचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी उमरखेडचे भाजपा आ. किसन वानखडे यांनी हिवाळी
अधिवेशनात सभागृहात केली.इसापूर सिंचन प्रकल्पाचे
पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडून योग्य नियोजन
होत नाही. दरवर्षी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पाणीटंचाईमुळे
बेहाल होतात. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी पैनगंगा पात्रात योग्य
नियोजन करून सोडावे, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा
नवनिर्वाचित आ. वानखेडे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
हिवाळ्यापासूनच खेडेगावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे
दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.शेतातील ऊस यासह रब्बी पिके
वाळून जातील अशी भीती आहे.पशुधनही पाण्यावाचून आक्रोश करीत आहेत. ही परिस्थिती गतवर्षी भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वानखडे यांनी मांडली होती. आपल्या कार्यकर्त्यांसह नदीकाठावरीलगावामध्ये जाऊन
वाळलेल्या पिकांची पाहणी केली होती. त्यावरून त्यांनी १७
डिसेंबर रोजी विधानसभेतील अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा मांडून आपल्या पंचवार्षिक कार्य काळाचा प्रारंभ केला आहे, हे