Uncategorized
आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हदगाव तहसील मार्फत राज्याचे कृषिमंत्री यांना निवेदन दिले.

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर
ई-पीक पाहणी अॅपचा वापर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना करता येत नाही. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. याशिवाय सर्वच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने ई-पीक पाहणी बांधावर जाऊन करता येत नाही. त्यामु़ळे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना नोंद करता आली नाही. त्यामुळे सरकारने ही ई पीक पाहनी नोंदणीची लावलेली अट रद्द करून सोयाबीन, कापूस लागवड केलेल्या सरसकट शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ द्यावा म्हणून आज निवेदन दिले. यावेळी उपस्थित शेतकरी नेते आत्माराम पाटील वाटेगावकर, अनिल पाटील कदम (प्रहार तालुकाध्यक्ष), नागोराव पाटील सूर्यवंशी, अविनाश मोरे, विवेक भाऊ वानखेडे, संतोष माने, सौरभ अमृते, अरविंद सुर्यवंशी, व इतर शेतकरी मंडळी उपस्थित होते.