शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा – (जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांचे प्रतिपादन)

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड:-विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच चांगले नागरिक बनुन देशसेवा करण्याचे धडे त्यांचा संपुर्ण सर्वांगीण विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी केले आहे.
स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी जि.प.उच्च प्राथमिक शाळेत २०२३-२४या सत्रातील हंगामी अनिवासी वस्तीगृहाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, हंगामामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील ऊसतोडणीसाठी गेले आहेत त्यासाठी शिक्षण विभाग व साखर आयुक्तालयाच्या वतीने हंगामी वसतीगृह चालविले जाते जेणेकरून आईवडील ऊसतोडणीसाठी गेल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.शिक्षण हमी कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवाहात राहावे यासाठी प्रयत्न आहेत.त्यामुळे शिक्षकांनी केवळ शालेय शिक्षणाचे धडे न देता भविष्यात या विद्यार्थ्यांना समाजात वावरतांना सामाजिक भान जपत वावरण्याचे तसेच चांगला नागरिक बनुन देश सेवा करण्याची प्रेरणा सुद्धा दिले पाहिजे असे घोष म्हणाले.
नागापुर शाळेने यावर्षी ९१ विद्यार्थ्यांची नोंद करून हंगामी अनिवासी वस्तीगृहात प्रवेश दिला आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ४एकरवर पसरलेल्या स्मशानभुमीत लावलेल्या “बिहार पॅटर्न”अंतर्गत १२००झाडांची पाहणी केली.गांवामध्ये फिरून स्वच्छतेबाबत गावकऱ्यांचे कौतुक केले.महात्मा गांधी रोजगार हमी योजना व ईतर संलग्नित योजनेतून ५८ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या “राजीव गांधी भवन” च्या कामांची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर शाळेमधील भौतिक सुविधा, संगणक कक्ष, मुख्याध्यापक कार्यालयाला भेट देऊन , विद्यार्थ्यांशी हितगुज केली.तसेच हंगामी अनिवासी वस्तीगृहाचे फीत कापून शुभारंभ केला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सरांनी प्रस्ताविक करून गावकऱ्यांनी स्वच्छतेसाठी सातत्य ठेऊन अनेक पुरस्कार मिळवून गावांचा सर्वांगीण विकास साधला याबाबत गावकऱ्यांचे आभार मानून स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात जिल्हा परिषद मराठी शाळा मुळावा(मुले) मुख्याध्यापिका केंद्रे मॅडम यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल,बारा येथील सहाय्यक शिक्षक पाचकोरे सर यांना पीएचडी मिळाल्याबद्दल, पळशी येथील सहाय्यक शिक्षक देशमुख सर यांना झेप अंतर्गत पुरस्कार मिळाल्याबद्दल घोष यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी जि.परिषदेच्या प्रकल्प संचालक रसाळ मॅडम, प्रवीण कुमार वानखेडे (गटविकास अधिकारी उमरखेड), गजानन पिल्लेवाड ( अतिरिक्त गट विकास अधिकार, सतीश दर्शनवाड ( गटशिक्षणाधिकारी), स्वच्छ भारत मिशनचे महेंद्र गुलाने, एपीओ पांडे, राठोड, पीटीओ टेकाळे, लक्ष्मण वानखेडे, कीर्ती माखणे पटवारी, भगत मॅडम (कृषी सहाय्यक), माजी सभापती सौ.सविता कदम, गोदाजी जाधव उपसरपंच, गुलाब महाराज आडे( अध्यक्ष तंटामुक्त समिती), बापूराव कुरमे (उपाध्यक्ष तंटामुक्त समिती(, रमेश कुरमे (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती), लताबाई जाधव ग्रामपंचायत सदस्या, रामराव जाधव माजी सरपंच, मारुती कदम पोलीस पाटील, बंडू कदम, मारुती ठेंगे, प्रताप आडे, प्रकाश शिंदे( मुख्याध्यापक,) बालाजी कदम सर, छाया चाकोरे मॅडम, सुनंदाबाई जाधव, ज्योती कदम, कविता कदम, कविता कुरमे, गोपीनाथ आडे, उत्तम राठोड ग्रामपंचायत सदस्य, सुरेश देशमुख यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनय चव्हाण सर यांनी केले.
चौकट
शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अखंड ज्योत प्रज्वलित.
नागापुर येथील स्व.भाऊसाहेब माने पुरस्कार प्राप्त मोक्षधाम मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या शिलालेख जवळ अखंड ज्योत मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.
चौकट
माझे ताट स्वच्छ ताट अभियानाचा शुभारंभ.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा आपल्या अपार मेहनत, कष्ठ करून घाम गाळून अन्न पिकवतो परंतु आज मितीला जेवणावळी मध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असुन शेतकऱ्यांच्या घामाचे मोल कोणालाच कळत नसल्याने हा प्रकार कुठे तरी थांबला पाहिजे याकरिता भारत स्काऊट गाईड च्या वतीने शेतकऱ्यांच्या कष्ठाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “माझे ताट स्वच्छ ताट” ,”जेवढे पाहिजे पोटात तेवढेच घ्या ताटात “हे अभियान सुरू करण्यात आले असुन या अभियानाचा शुभारंभ जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.