प्रशासनाने दीले पंधरा दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन!म्हणून उपोषण मागे,

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागांव तालुक्यातील माळवागद येथील तक्रार कर्ते पुर्थवीराज चव्हाण हे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर माळवागद ग्रां.प.येथील विकास कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारात अनियमितता व शासनाच्या निधीत अपहार झाल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार दिल्यानंतरही चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यावर कार्यवाही न झाल्याने अखेर तक्रार कर्ते पुर्थवीराज चव्हाण यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला.व नंतर त्यांना जिल्हा प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात माळवागद गैरव्यवहार प्रकरणी कार्यवाही करू असे लेखी पत्र देऊन आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली त्यामुळे उपोषण कर्त्यानी आपले उपोषण मागे घेतले.येत्या पंधरा दिवसात सदर प्रकरणी कार्यवाही न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण करू असा इशारा उपोषणकर्ते पुर्थवीराज चव्हाण यांनी दीला आहे.