Uncategorized

वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीन दोस्त!शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होणार का ?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात दि-१०-६-२०२५ रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे वेणी माळकिनी वाकान बिजोरा डोंगरगाव येथील शेत शिवारात केळीच्या बागा घराची पडझड व शेतातील विद्युत प्रवाह चे विद्युत खांब पडून अतोनात शेतकऱ्याचे केळी पिकाचे नुकसान झाले आहे. वेणी येथील नाना दौलत पुंडे ,सनद मुळे, तसेच माळकिनी शिवारात विशाल खंदारे ,अमोल मदने ,पांडुरंग चव्हाण, यांच्या केळीच्या बागा वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाले आहे .तसेच इलेक्ट्रिकचे पोल बिजोरा येथील गायकवाड यांच्या शेतातले पडल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या सुद्धा फळाची झाडे पडून नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे .यापूर्वी वादळामुळे टेंभी येथील घरांच्या भीती पडून टीन पत्रे उडून गेल्यामुळे नुकसान झाले होते. त्यावेळेस देखील वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता व एक महिला जखमी होती तेव्हा वादळी वाऱ्यामुळे झालेले घराचे नुकसानाचे पंचनामे आज पर्यंत झाले नाही .तसेच काल झालेले वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीन दोष झाल्या त्या शेत पिकाचे पंचनामे व नुकसान भरपाई मिळेल का ?या प्रतीक्षेत शेतकरी चिंतेत पडला आहे.हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतलेला आहे.सध्या केळीला बाजार भाव चांगला आहे सदर शेताचे केळीचे धड दोन ते तीन दिवसांमध्ये व्यापारी घेऊन जाणार होते त्यामुळे त्या शेतकऱ्याची पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले . वेणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पुंडे यांनी शासनाकडे शेत पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.तसेच विजाच्या कडकड्यात धारकांना येथे 40 पाळीव जनावर धरणाच्या काठी मृत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत आढळले त्यामुळे निसर्गच महागाव तालुक्यावर कोपलाका ? अशा परिस्थितीत शासनाच्या महसूल अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन झालेल्या शेतकऱ्यांचे शेत पिकाचे, तसेच घर पडल्याचे ,विद्युत प्रवाहाचे पोल ,पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधी आमदार किसन वानखडे यांनी उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांना सोबत घेऊन महागाव येथे सर्व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन जनता दरबार घ्यावा अशी मागणी महागाव परिसरातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिक करीत आहे .बैठकीत ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले.आहे जनावर दगावली आहेत, घर पडल्या आहेत ,विद्युत ताराचे खाब पडले आहेत ,ते सर्व प्रकरण निकाली काढावे व विद्युत प्रवाह सुरळीत करून महागाव तालुक्याला अंधार मुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.हे लोकप्रतिनिधी आमदार व शासकीय अधिकारी करतील का याकडे जनतेची लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!