साई श्रध्दा नगर येथे भिषण पाणी टंचाई पाणी समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेडः येथिल साईश्रध्दा नगर येथे अनेक वर्षापासून बऱ्याच समस्या आहेत. पाणी टंचाई, विजेच्या खांबावर लाईट नाहीत, रस्त्याची दुरदशा झाली आहेत. ह्या समस्या सोडविण्याकरिता मुख्यधिकारी, नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले. बायपासच्या पलिकडील भाग म्हणजे साईश्रध्दा नगर, स्वप्न नगरी, दत्तनगर या सर्व भागात अनेक समस्या उदभवलेल्या असतांना प्रशासन याकडे लक्ष देत नाही. नगरपरिषदमध्ये ८० लाखाचे रस्ते मंजुर झालेले आहेत तसेच नळयोजनेसाठी ४५ लाख रुपये मंजुर होऊनही कामाला सुरुवात नाही. विजेचे खांब आहेत पण त्यावर लाईट चालू नाहीत. त्यावर लाईट लावण्यात यावे म्हणून मुख्यधिकाऱ्यांना विनंती करण्यात आले. जवळपास सर्वाचे बोअर आटले आहेत. पाण्याची समस्या गहन होत चाललेली आहे. जोपर्यंत नळयोजना येत नाही तोपर्यंत या उन्हाळ्यात टॅकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात यावे म्हणून मुख्यधिकारी महेश जामनोर यांना येथिल रहवास्यांनी निवेदन दिले आहे.