मान्सूनपूर्व नियोजनाच्या अभावामुळे महावितरणचा फुगा फुटला विजेअभावी नागरिक त्रस्तअवकाळी पावसात उमरखेड शहर अंधारात

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड: ५ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक
वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. महावितरणचे नेहमीप्रमाणे यंदाही मान्सूनपूर्व नियोजन योग्य नसल्याचे उघड झाले. परिणामी संपूर्ण शहर रात्री ११ वाजेपर्यंत अंधारात राहिले तर उर्वरित काही भाग रात्रभर अंधारात राहिला, यामुळे महावितरणचा फुगा फुटला तोही पहिल्या पावसात अशी म्हणण्याची वेळ उमरखेडवासीयांवर आल्याचे बोलले जात आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारासंदर्भात यापूर्वी अनेकांनी तक्रारी नागरिकांच्या यतीने करण्यात आल्या आहेत. राजकीय पुढाऱ्यांनीही त्यांना अनेक वेळा सूचना दिली आहेत, परंतु महावितरणचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. बिला संदभांत अतिशय कठोर भूमिका घेणाऱ्या महावितरण कर्तव्यात मात्र पूर्णविरोधाभास दिसून येत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. हवामान खात्याने पाच दिवसांचा अवकाळी पावसाचा अंदाज दिला असतानाही महावितरणकडून त्या संदर्भांत कुठली उपाययोजना करण्यात आली नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे, या उलट सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर तक्रार निवारण कक्षात एका माहिती नसलेल्या मुलीला बसविण्यात आले होते व ती प्रत्येकाला फोन उचलून दोन तासात तुमचा वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे उत्तर देत होती, असे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. अशातच अधिकारी मात्र कोणाचाही फोन उचलत नसल्याचे चित्र होते.
एवढ्या मोठ्या शहरांमध्ये बीज दुरुस्ती करण्यासाठी रात्री फक्त दोन लाइनमन उपलब्ध होते. पूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांचे नियोजन किती उत्तम आहे, त्याची हे उदाहरण समजायचंच. शहरात व ग्रामीण भागामध्ये अवैध कनेक्शन असताना त्यावर कुठलीही कारवाई न करता कशाप्रकारे वसुली करता येईल, असा एकमेव कार्यक्रम महावितरणच्या कार्यालयातून चालू असल्याची चर्चा शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळते.पावसाळ्यापूर्वी सर्व बीजेची कामे व्यवस्थित करून घेणे, जीर्ण झालेल्या तारा बदलणे वासाठी मोठ्या प्रमाणात ठेके दिले जातात परंतु त्यामध्ये होत असलेल्या अनियमिततेमुळे कुठल्याही ठिकाणची वीज व्यवस्थित दुरुस्ती केली जात नाही आणि त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी वीज ग्राहकातून केली जात आहे. रात्री ११ वाजता जवळपास १०० ग्राहकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांना उत्तर देण्यास कोणीच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांत महावितरण विरोधात चांगलाच रोष निर्माण झाला आहे.