Uncategorized

युवकांनी बाबासाहेबांच्या सामाजिक सुधारणेचा वारसा पुढे न्यावा – प्रो.डॉ . अनिल काळबांडे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

.उमरखेड : डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांचा संघर्ष हा फक्त इतिहास नसून आजही मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायक आहे . युवकांनी त्यांच्या विचारसरणीनुसार सामाजिक सुधारण्याचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रो.डॉ . अनिल काळबांडे यांनी व्यक्त केले .तालुक्यातील बेलखेड या गावी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग संघ म्युझिकल ग्रुप यांचा प्रबोधन गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यकमाच्या उद्घाटन करतांना ते बोलत होते . या कार्यक्रमाला महात्मा फुले पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तराव काळे , पत्रकार बाळासाहेब ओझलवार , सरपंच चंद्रकला कदम ‘उपसरपंच अतुल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले . यावेळी डॉ . काळबांडे यांनी मार्गदर्शन करतांना ‘ डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी युवका संदर्भात दिलेले विचार या विषयावर ते बोलताना होते .ते म्हणाले की डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातीलच नाही तर विश्वातील मानव जातीच्या हक्कासाठी त्यांना माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला या संघर्षातूनच देशाला सुंदर असं संविधान दिलं या संविधानामुळेच आज आपण सर्वजण माना सन्मानाने जीवन जगत आहोत . परंतू आजची परिस्थिती पाहता समाजात जातीयवाद ,धर्मांर्धता विषमता प्रामुख्याने पसरतांना दिसत आहे अशा वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी विचार या देश्यात पेरणे गरजेचे आहे तेच विचार या देशाला एकसंघ करू शकतात , या देशाला विकासाकडे नेऊ शकतात त्यासाठी आजच्या युवकांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक या सह सर्वच विचाराचा वसा आणि वारसा घेऊन जीवन जगावे असे ते यावेळी म्हणाले . त्यानंतर जागर संविधान यात्रा मार्फत दिव्यांग संघ हिंगोली मार्फत बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनकारी गीतांचा कार्यक्रम सदानंद तायडे यांच्या संयोजनात यांच्यागायक प्रवीण कठाळे बाळासाहेब तपासकर ,आनंद पानचाळ ‘ सोमनाथ आफुणे, दुर्गा तंबलवार आणि संच यांच्या माध्यमातून प्रबोधनाचा गीताचा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न बॉईज मंडळ यांचे अध्यक्ष विजयानंद शिंगणकर आणि त्यांच्या संपूर्ण टिमने केले या कार्यक्रमाचे संचालन डी बी शिंगणकर यांनी तर आभार भगवान शिगणकर यांनी मानले . (सोबत फोटो )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!