पाण्यासाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतवर मोर्चा धनज येथील गावकऱ्यांचा पाण्यासाठी सरपंच ,सचिव यांना घेराव

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : उमरखेड तालुक्यातील धनज हे आदिवासी गाव म्हणून ओळखले जाते,याच गावाला समोरच्या बाजूला एक उंच धरण आहे त्या धरणांचे पाणी जवळपास 11 एकर जमीन एरीकेशन करते आणि तीन ते चार गावाला याच धरणामुळे पिण्याचे पाणी मिळते एवढा भरपूर प्रमाणात पाणी असून सुद्धा आज रोजी धनच वाशी यांना आठ ते पंधरा दिवसानंतर पाणी मिळते दुर्दैवाची गोष्ट आहे,धनज येथील धरण हे कधी न कोरड होत नाही,पण या वेळेस कोरडे झाले आहे,आणि गावावर पिण्याचा पाण्याचा संकट उभं राहिलं आहे,
वॉटर सप्लायची विहीर -बारा पधरा फूट खोल आहे धरण अटल्यामुळे वीर सुद्धा आटल्या गेली दोन दोन दिवसानंतर कसा वसा टाक भरला जातो कारण मेन पाईपलाईनला दहा ते बारा कनेक्शन घेतलेले आहे, त्यामुळे पाणी हे टाक्यावर जास्त चढत नाही जोपर्यंत टाक्यांमध्ये चढत नाही तोपर्यंत लोकांना पाणीच येत नाही या कारणासाठी गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालय सरपंच ग्रामसेवक यांना घेराव घातला तो पाण्याची मागणी केली

ग्रामपंचायत ने वीर अधिग्रहण करतील का लोकांना वेळेवर पाणी मिळेल का गावातील लोक सर्व समजदार असल्याकारणाने ग्रामपंचायत ही त्या लोकांची खरोखरच लूट करत आहेत या ग्रामपंचायतीवर कोणाचं वचक नाही गावातील मजूर वर्ग हे एकमेकांच्या विरोधात जात नाही त्याच्यामुळे गावकऱ्यांचा भरपूर फायदा घेत आहे उमरखेड तालुक्यात या गावांमध्ये एकटटा मतदान होते म्हणून सर्व राजकारणी लोकांनी पूर्णपणे गाव मध्ये पळत येतात आणि निवडणूक झाले की सर्व दुर्लक्ष करून कोणी या गावात लक्ष करत नाही किती शोकांतिका आहे हर घर जल म्हणजेच
प्रत्येक घरासाठी अनुवादित पाणी ही भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. ज्याचे उद्दिष्ट 2024 पर्यंत दीर्घकालीन आधारावर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई 55 लिटर नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने होती. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून जल जीवन मिशन योजना राबवली आहे टाक्याचे काम अर्धवट झालेले आहेत गावातील नळ योजना सुद्धा दूर केलेली आहे आतापर्यंत नवीन जीवन योजनेमधील टाकत काम सुद्धा पूर्ण झालेले नाही नवीन नळ योजना येतात या कामाची चौकशी करावी आणि त्या ठेकेदारावर कारवाई करावी सदर योजना कशी आमलात आणावी पाण्याचा कसा वापर करावा जलजीवन मिशन अंतर्गत यांचे पंचायत समिती स्तरावर

प्रशिक्षण घेतले जाते,त्यावरही शासन हजारो कोटी खर्च करत आहे परंतु अद्याप बऱ्याच ग्रामपंचायत ला नवीन टाके हे गावाची शोभा म्हणूनच राहीले त्यापैकी धनज एक ग्रामपंचायत आहे जिथे पाण्यासाठी ग्रामस्थ वनवन फिरत आहेत भर उन्हाळयात गुरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही ग्रामपंचायत ला वारंवार सांगूनही अद्याप नळाला पाणी व्यवस्थित रित्या आलेच नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल अशी गावकऱ्यात चर्चा केली जात आहे. एकीकडे आपण देशाचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि दुसरीकडे आजही पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे यावर प्रशासन नेते मंडळी आणि पुढारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत.