अध्यात्मिक सोहळ्याला सामाजिक प्रबोधनाची किनार देणारा अनोखा उपक्रम!

•’महिला सुरक्षिततेसाठी कुटुंब व शाळेतुन संस्कार महत्त्वाचे’-
अँड अस्मिता टाकणखारे
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- ‘महिला सुरक्षिततेसाठी कुटुंब व शाळेतुन संस्कार होणे महत्त्वाचे आहे.ह्या दोन्ही ठिकाणी मुलिंना जबाबदारी तर मुलांना स्त्रियांबद्दल आदर करायला शिकवले गेले पाहिजे.शासन व समाजानेही संवेदनशीलपणे लेकीबाळींना जपलं पाहिजे ‘असे प्रतिपादन ॲड .अस्मिता टाकणखारे यांनी केले.त्या ‘ ‘लेकीबाळीची सुरक्षितता आणि समाजघटकांची जबाबदारी’ या विषयावर विडूळ प्रबोधनमालेत बोलत होत्या.
येथील उमामहेश्वर संस्थानाच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या अखंड शिवनाम सप्ताहातील सामाजिक विचारांची प्रबोधनमाला दिग्गज महिलांच्या व्याख्यानांनी गाजली.गत चार वर्षांपासून सदर व्याखान्याचे आयोजन समितीतर्फे करण्यात येते.धार्मिक कार्याबरोबर कौटुंबिक व सामाजिक जाणीवा बळकट होण्याच्या दृष्टीने हे अनोखे पाऊल मानले जात आहे.
३ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत चाललेल्या ह्या सोहळ्यात विरशैव परंपरेतील अनेक गुरुवर्यांचे आशिर्वचन झाले.ह्या धार्मिक संस्काराबरोबर आधुनिक काळातील ज्वलंत प्रश्नांची उकल करण्याच्या हेतुने दररोज एक तास प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.एकुण सहा दिवस चाललेल्या ह्या वैचारिक जागरात शिक्षण,समाज,पर्यावरण, कुटुंब,आरोग्य ,व्यसनमुक्ती ,महिला सुरक्षा आदि विषयांवर मंथन करण्यात आले.त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्यात्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
प्रबोधनमालेत ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ यावर
-आर.डी.शिंदे ,’संस्कृती संवर्धन’ यावर विशाल गिरी,
अक्कामहादेवी,जिजाऊ, सावित्रीबाईंचा वारसा नको का?
यावर प्रा.सिमा शेटे नवलाखे यवतमाळ ,’आपल्या लेकीबाळीची सुरक्षितता आणि समाजघटकांची जबाबदारी’ या विषयावर ॲड. सौ.अस्मिताआढावे-टाकणखारे ,’हरवत चाललेली नाती आणि आपण’ यावर सुवर्णा नालिंदे बाकडे अकोला व ‘कुटुंब सांभाळण्यात स्त्रीयांची भुमिका’ या विषयावर प्रा.निता कमठाणे यांच्या व्याख्यानातून अभ्यासपूर्ण प्रबोधन झाले.