Uncategorized

एकसंघ राष्ट्राची निर्मिती म. फुले यांच्या विचाराने शक्य…!डॉ. प्रेम हनवते

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : महात्मा फुले यांनी विषमतावादी विचारसरणीला नष्ट करून समताधिष्ठित नवसमाज निर्मितीचे प्रमेय मांडले. एक बंधुत्व या संकल्पने वर आधारातील एकमय लोक किंवा एकमय राष्ट्र निर्माण करणे हे महात्मा फुले यांचे जीवन ध्येय होते. आजच्या अस्वस्थ वर्तमानात आम्ही एक होणे आवश्यक आहे. एकसंघ बळकट राष्ट्र निर्मिती साठी महात्मा फुले यांच्या विचाराची गरज आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेने जाऊन त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे हे वैचारिक वारसदार म्हणून आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन उमरखेड चे भूमिपुत्र डॉ प्रेम हनवते यांनी केले.
महात्मा फुले स्मारक समिती उमरखेड च्या वतीने आयोजित म. फुले जयंती निमित्त अभिवादन सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सांस्कृतिक संघर्षा लढ्या चे नायकत्व स्वीकारून जाती अंताचा लढा उभा केला. या लढया ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालवीले. आम्ही ही सत्यशोधक आहोत हे डॉ. आंबेडकर यांनी अभिमानाने सांगितले. आज स्वतःला सत्यशोधक म्हणवीणारे मात्र फुल्यांचे नाव सोईनुसार वापरून घेतात. विचारात आणि सामाजिक आचरणात असलेल्या प्रचंड विसंगतीमुळे फुल्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे पातक आम्ही करत आहोत. महात्मा फुले यांचे जीवनकार्य आणि विचारांचा पुन्हा अभ्यास करुन त्यांचे वैचारिक वारसदार बनल्याशिवाय क्रांती चे चक्र गतिमान होणार नाही. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितिचे अध्यक्ष डॉ अनिल काळबांडे हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ राजेश कानडे , महात्मा फुले पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तराव काळे, दीपक कांबळे , विरेंद्र खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले . या वेळी पत्रकार डॉ अविनाश खंदारे , प्रा संतोष मुडे , राजु गायकवाड , संभाजी भोयर ‘गजानन भारती , अरुण बेले , विजय कदम , स्वप्नील मगरे , सह राहुल काळबांडे ,माधवराव दैत्य, शैलेस अनखुळे, सुभाष मते ‘गंगाधर मते , प्रभाकर चव्हाण , डी एम वाघमारे , भिमराव सोनुले, यशवंत काळबांडे , दादाराव आठवले , जि एस मुंडे , चेतन पतिगराव , दिपक ठाकरे ‘ रेखा भरणे , स्वरांजली वाघमारे सह अनेक मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .डॉ . काळबांडे यांनी आपल्या अध्यक्षीयभाषणात , महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो सत्यशोधक आपल्याला मार्ग दिलेला आहे त्याच मार्गाची आज सर्वांना गरज असल्याचे प्रतिपादन केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष निथळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा . गजानन दामोदर तर आभार प्रदर्शन उत्तमराव शिंगणकर यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!