Uncategorized

स्कूल बस अपघात प्रकरणाचा तपास ठाणेदारांकडून काढण्याची मागणी

मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:-तालुक्यातील दिवटपिंपरी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत स्कूल बस अपघातात मृत्यू झालेल्या महिमा हिच्या प्रकरणाचा तपास हा पोफाळी ठाणेदाराकडून काढून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे द्यावा. तसेच मृत महिमाच्या पालकांना संस्थेकडून १ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. दिवट पिंपरी व पोफाळी परिसरातील मुले स्टुडंट वेलफेअर इंग्लीश मेडीअम स्कुल दहागांव येथे शिक्षण घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यास शैक्षणिक शुल्क व शालेय बसचा भत्ता म्हणून वर्षाकाठी ६० ते ७० हजार एवढी रक्कम घेतात व इतर खर्च वेळोवेळी वेगळा घेतात. प्रवेशाच्या वेळी त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांची शाळेमध्ये व बसमध्ये बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, असे सांगतात. परिसरातील गावात स्टुडंट वेलफेअर इंग्लीश मीडिअम स्कुलची एम.एच.२९ एम. ८४८८ ही बस येते. तिची आसन व्यवस्था २६ अधिक १ अशी आहे. परंतु, त्यामधुन दररोज ४२ विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते. गावकऱ्यांनी वेळोवेळी बसमधील गर्दीविषयी व असुविधांविषयी शाळेचे संचालक, मुख्याध्याक व व्यवस्थापन समितीकडे तक्रार केली. परंतु, त्यांनी जास्त आसन व्यवस्था असलेली बस यागावात पाठवली नाही.

एसपींच्या मार्गदर्शनात सखोल चौकशी सुरू उमरखेड येथील इंग्लिश

मीडियम स्कूलच्या बसचा अपघात पळशी फाट्यावर झाला होता. त्यामध्ये महिमा सरकाटे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या प्रकरणातील दोन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून एक पथक तयार केले असून त्यांच्यामार्फत आरोपीचा कसून शोध सुरू आहे. – हनुमंत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!