विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड, दि. १४ : उमरखेड शहरात गत महिन्याभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना होत आहे. मात्र, अखंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्याभरापासून विजेचा लपंडाव सारखा सुरू आहे. जणूकाही अघोषित भारनियमन लादल्या जात आहे. नेमके भारनियमन करण्याचे कारण काय, असा प्रश्न अद्याप अनुत्तरी आहे. वीज वितरणचे अधिकाऱ्यांचा स्थानिक कर्मचाऱ्यांवर.
कुठलाही वचक राहिला नसल्याने दिसून येत आहे. या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहे. रात्री अपरात्री वारंवार विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठ्यासह इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या समस्येची कुठलीही जाणिव नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला येत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.