गौरी गणपती उत्सवातही स्वस्त धान्य वितरण ठप्प

लाभार्थ्यामध्ये संताप : धान्य उपलब्ध असतानाही वाटप नाही.
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
गेल्या १ सप्टेंबरपासून उमरखेड तालुक्यात ढगफुटीसदृष्य जोरदार पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेले खरीपाचे पिक उद्धवस्त झाले. अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने सबंध तालुक्यातील जनता त्रस्त झाली. शासनाणे मोठा गाजावाजा करुन अन्न सुरक्षा योजना लागू केली आहे. या योजनेचा मुळ उद्देश म्हणजेच अनधान्यासाठी कुणाचीही अबाळ होऊ नये असा आहे. परंतु, सण व उत्सवाच्या काळातही शासकीय धान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे जनता नाराज आहे.
सदर योजना प्रभावीपणे
राबविण्याची जबाबदारी ज्या विभागाच्या अंगाखांद्यावर दिली तो विभाग या योजनेची अमलबजावणी करण्यास असमर्थ ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. सध्या महालक्ष्मी, गणेश उत्सव,
सण उत्सवाची रेलचेल सुरु झाली असून गणपती उत्सव, गौरीपुजन यासारख्या सणासुदीच्या दिवसात व पुरपरीस्थीतीने लाभार्थी हतबल झाले असतानाच पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे पात्र लाभार्थ्यांना हक्काच्या मिळणाऱ्या धान्यापासून
वंचीत राहण्याची वेळ लाभार्थ्यांवर ओली आहे. याबाबत तालुक्यातील काही स्वस्त धान्य वितरकाना विचारणा केली असता आमच्याकडे धान्य आले, परंतु धान्य वाटप करणाऱ्या पॉश मशीनवर पुरवठा विभागाकडून साठा नोंदविल्या गेला नाही.
त्यामुळे धान्य दुकानात असूनदेखिल आम्हाला धान्य वाटप करता येत नसल्याची प्रतिक्रिया या बाबतीत विचारणा केली असता देण्यात आली. स्वस्त धान्य दुकानात
मागील ऑगस्ट महिन्याचा साठा पण उपलब्ध असतांना संबंधित काही गांवातील परवानाधारक दुकान दारांने गांवातील लाभार्थांना वितरण केले नसल्याने यांचेच कारण लाभार्थांना कळू शकले नाही.
पुरवठा विभाग वितरणांची गांवनिहाय सखोल माहिती ठेवत नसल्याने व ज्या दुकाणात शिल्लक साठा तपासणी मोहिम राबवित नसल्याने हि वेळ लाभार्थांना सहन करावी लागते हे वास्तव निरिक्षकांनी मागोवा घेतल्यावर हे दिखाई वास्तव उघड होईल. धान्य साठा शिल्लक असताना केवळ पुरवठा विभागाच्या अकार्य क्षमतेमुळे गरजवंत लाभार्थ्यांचे धान्यासाठी हाल होत असल्याचे दिसुण येत आहे.
चौकट
स्वस्तधान्य वाटप तत्परतेने करण्याचे प्रयत्न असतांना कदाचीत तांत्रीक अडचणीमुळे वेळ झाला असावा.
संग्राम गुट्टे, पुरवठा निरीक्षक, उमरखेड