शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत द्या..वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड: मागील आठवड्यामध्ये उमरखेड तालुका व परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन उमरखेड शहरातील रहीम नगर व तिवडी रोड परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून गृह उपयोगी वस्तूचे प्रचंड नुकसान झाले त्याचबरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पोषक वातावरणामुळे आशादाई ठरत असतानाच पावसाने प्रचंड हाहाकार माजवून शेतातील हाताला येत असलेल्या पिकाचे प्रचंड मोठे नुकसान होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली अशा वेळेस शासन व प्रशासनाने शेतकरी व अतिवृष्टी धारक यांच्या पाठीशी खंबीर उभे राहुन कुठल्याही प्रकारच्या जाचक अटी न लावता तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी व ज्यांचे घराचे व गृह उपयोगी साहित्याचे नुकसान झाले अशा बाधित कुटुंबांना 25 हजार रुपये तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन उमरखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सखाराम मुळे यांना देऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली या निवेदनावर डी.के. दामोधर जिल्हा महासचिव,संबोधी गायकवाड तालुका अध्यक्ष उमरखेड ,एस के मुनेश्वर तालुका महासचिव, आनंदराव वावळे तालुका महासचिव, तौफिक अहमद युवा नेते ,विश्वासराव धुळे तालुका उपाध्यक्ष, शेख दानिश, शेख आसिफ ,शेख फारुख ,शेख साकिब ,अशोक तलवारे ,शेख वसीम, संभाजी बहादुरे ,संतोष गायकवाड ,राजेश खंदारे, कैलास कांबळे ,बापूराव कांबळे, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्य असल्याचे निवेदन देण्यात आले.