एका महिण्यात नळजोळनी चे काम करा अन्यथा आमरण उपोषण करणार — सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ सर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
अजिम हिंदुस्तानी
हिमायतनगर शहरात भीषण पाणी टंचाई ; होत असून, पाण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा नगर पंचायत प्रशासक देण्यात आला,
नगर पंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हिमायतनगर शहर वासीयांना पाणी मिळाले नाही , त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ सर यांनी आयुक्त तथा संचालक नगरपंचयत प्रशासन संचालनालाय मुंबई यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड , तहसीलदार , पोलीस प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देऊन एका महिन्यात पाणी न मिळाल्यास 5 जून पासून बेमुद्दत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला,
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालय अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम दिनांक 02.07.2019 पासून सुरु करण्यात आले असून , सदरील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा निधी केंद्र सरकार , राज्य सरकार आणि नगर पंचायत हिमायतनगर असा तिघांचा मिळून रक्कम 19 कोटी रु . इतका आहे . सदर नळयोजनेचे काम गुत्तेदार यांनी 24 महिन्याच्या आत पूर्ण करण्याची हमी घेऊन तशा अटी व शर्तीवर करारनामा केला आहे .
पण पाणीपुरवठा योजनेच्या काम चालू होऊन जवळपास 5 ते 6 वर्षाचा काळ संपत आला तरी आजपर्यंत काम पूर्ण झाले नसून हिमायतनगर शहरातील जनतेचे पाण्याअभावी भटकंती होऊन बेहाल होत आहेत . याला जबाबदार कोण हिमायतनगर नगर पंचायत प्रशासक, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
हिमायतनगर शहर पाणीपुरवठा नळ योजनेचे काम चालू होऊन 5 ते 6 वर्षाचा काळ संपत आहे . दिलेल्या मुद्दतीत काम केले गेले नसल्याने अद्यापपर्यंत . एम . टी . फड ह्या गुततेदारांना कोणत्याही प्रकारचा दंड का .. ? आकारण्यात आला नाही असा प्रश्न निवेदनात विचारला आहे . यावरून असे समजते की कार्यान्वित यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड , ह्यांचे अधिकारी व कर्मचारी यांची कुठल्याही प्रकारचे कामावर नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही .
आजपर्यंत नगरपंचायत हिमायतनगर ह्याच्याकडून सदरील गुत्तेदारास कामाचा अडवांस बिल म्हणून 15.28 कोटी रु .इतका निधी पोहोचला असून , तरीदेखील काम अद्यापपर्यंत पूर्ण होत नाही,
सतत वीस वर्षा पासून हिमायतनगर शहर वासीयांना पाणी आपल्या घरा पर्यंत येईल, असे वाटत होते, गेल्या वीस वर्षांत पाणी पुरवठ्याचे अनेक योजना गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या वैक्तीक राजकारण मध्ये हे कमेटी ते कमेटी म्हणून कधीही पाणी पुरवठा काम पूर्ण होऊ दिले नाही,
त्यानंतर हिमायतनगर येथील नागरिकांचा विश्वास राजकीय नेत्यावरुन उडून गेला,
पुन्हा एक दशका नंतर शहरी पाणी पुरवठा योजना आली, हिमायतनगर येथील जनतेंनी शासकीय अधिकारी यांचेवर विश्वास ठेवला की आम्हाला लवकरच पाणी मिळवून देईल,
परंतु हिमायतनगर नगर पंचायत च्या ढिसाळ कारभारामुळे व संबंधित पाणी पूरवठाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी हिमायतनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामावर जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसून आल्यामुळे, हिमायतनगर येथील आम नागरिक हवालदिल झाले आहे,
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ सर यांनी आमरण उपोषण चा इशारा दिला आहे,