पो. स्टे. पोफाळीचे ठाणेदार रूजू झाले तेव्हापासून गुन्ह्यात वाढ

ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह!
शेख इरफान
मुख्य संपादक
मुळावा परिसरात पोलीस प्रशासनाचा वचक संपला मागील दोन महीन्यात गावामध्ये दोन जातीय दंगली घडल्या. एक मर्डर तर दुसरा हाप मर्डर घडला त्यानंतर चोरीचे मटका गुटका दारू गांजा प्रमाण वाढले ज्या दिवशी मर्डर झाला त्याच दिवशी दुकान फोडणीची घटना घडली रेती तस्करांची खुलेआम रेती तस्करी चालु आहे. ठाणेदाराला हप्तेखोरीची लत लागल्यामुळे व अवैध व्यवसायीकांकडून कश्या प्रकारे मलीदा मिळेल याकडे ठाणेदाराचे लक्ष असून परिसराकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. हल्ली घडलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत दंगल
घडली ही गावमध्ये मागील वीस वर्षात पहीली घटना आहे.
ठाणेदारांनी मिरवणुकी वेळी फक्त तिन कर्मचारी कामी लावले होते. अपुरा बंदोबस्तामुळे मिरवणुकी दरम्यान यंत्रणा सुस्त
होती. यावरुन पोलीस प्रशासनाचा वचक संपला का असा प्रश्न उपस्थित होतो. यापुर्वी बसस्थानकावर 14 एप्रिल च्या उत्सवानिमित बाबासाहेब अंबेडकरांच्या बॅनरला एका युवकाने फाडले होते. यावरुन गावात तनाव निर्माण झाला होता यावेळीही ठाणेदाराने या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर दि ४ जुलै रोजी राहुल मतने या युवकाने एका ३८ वर्षीय इसमाचा चाकुने खुन केला. खुन झालेल्या युवकाने पोलिस स्टेशनला दोन दिवसापुर्वीच माझ्या जिवाला धोका आहे याची माहिती दिली होती पण गुन्हे बींग ठेवण्याची सवय असलेल्या ठाणेदारांनी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले व अविनाश यास आपला जिव गमवावा लागला. त्यानंतर ४ जुलैला मध्यरात्री चोरट्यांनी मुळावा ते शेंबाळपिंपरी मार्गावरील चव्हाण कलेक्शन हे कापड दुकान फोडून दिड लाखांचा मुद्देमाल चोरला. ठाणेदारांना आपल्या कर्तव्याची किती जान आहे हे या घटनेवरुन व त्यांच्या कार्यप्रणालीवरुन लक्षात येते. सदर ठाणेदार हे पोलिस प्रशासनात गटाबाजी करत असल्याने पोलिसांचा वचक संपत चालला आहे. गुन्हे बर्कंग करण्याचा छंद या ठाणेदाराला लागला असुन
गावात त्यांनी आर्थिक लुट सुरु पोलिस अधिक्षकांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे व लाचखोर ठाणेदाराला धडा शिकवण्याची मागणी जनतेतून होत आहे. पोलिस अधिक्षकांनी आताही या लाचखोर ठाणेदारावर काही कारवाई नाही केली तर यापेक्षाही अनुचीत प्रकार घडू शकतात हे नाकरता येत नाही. ठाणेदार पोलिस प्रशासनात करत असलेल्या गटाबाजीमुळे गावातील वातावरण अजुन दुषीत होण्याच्या मार्गावर आहे. तात्काळ ठाणेदावर व त्यांच्या या कार्यात सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.