उमरखेड शहरामध्ये वाहतुकीचे वाजलेले तीन तेरा

(गर्दीच्या चौकामध्ये एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर नाही)
सिद्धार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड (दि. १० जुलै) उमरखेड शहर हे व्यापारी, बाजारपेठ, व्यवसायिक केंद्र मोठ्या प्रमाणावर असून तालुक्यातील अनेक लोक आपली वाहने घेऊन उमरखेड शहरांमध्ये शहराच्या चारही बाजूने येत असतात.
त्यामुळे शहरातील मुख्य चौक माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी चौक, मारुती मंदिर या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
आज शहरातील बाजार असल्यामुळे रोजच्यापेक्षा दुप्पट गर्दी झाली दिसत आहे. पण सदर वाहतूक मोकळी करून देण्याकरिता कोणताही वाहतूक शाखेचा कर्मचारी उपस्थित नसतो.
हे कर्मचारी शहराच्या बाहेरील चारी बाजूच्या रस्त्यावर वाहने अडवून वसुली करिता थांबलेली असतांना दिसून येत आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी हे चौकामध्ये थांबुन अडकलेली वाहने सुरळीत करण्यासाठी उपस्थित नसताना दिसत आहेत. म्हणून शहरांमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले दिसत आहेत असा सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासन याच्यावर काय कारवाई करेल असाही प्रश्न वाहन चालकाच्या बोलण्यातून निघत आहे.