एसटी बस स्थानक मध्ये थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आवारातील स्वच्छता ठेवा..!

( ‘प्रहार’ च्या वतीने आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उमरखेड यांना, देण्यात आले निवेदन)
सिध्दार्थ दिवेकर ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. 30 एप्रिल) बसस्थानकातून दिवसा मधून शेकडो प्रवासी आपला प्रवास करतात.
एवढ्या कडक उन्हात जीवाची लाही लाही होत असतांना येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहे.
पण हे पाणी पिण्या योग्य नसल्याने ते पाणी प्रचंड गरम आहे, त्या पाण्याचा प्रवाशी फक्त हात धुण्यासाठी पाण्याचा वापर करतात.
या परिसरातील आवारात लोकांनी तंबाखू, पान गुटखा, खाऊन भिंती लाल करून टाकलेले आहे. बहुतांश प्रवासी ते परिस्थिती पाहून, तिथले पाणी न पिता वापस जात आहे.
तरी तेथील स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी.
व प्रवाशांना थंड व स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध करून देण्यात यावे.
एकीकडे एसटीकडून प्रवाशांसाठी विविध योजना आणि सवलतींचा पाऊस येत आहे. मात्र ऐन कडक उन्हाळ्यात प्रवाशांना थंड पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याने प्रवासामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे गरीब प्रवाशांना बसस्थानकात परिसरातून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दड प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
तरी आपणास विनंती आपण प्रवाश्यांना लवकरात लवकर थंड पाणी उपलब्ध करून दयावे,व तेथील स्वछता करण्यात यावी.
यावेळी प्रविण बि.इंगळे, प्रफुल एस.वानखडे, विवेक पा.जळके आदी उपस्थित होते.