सामाजिक

आदिवासींनी राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी तयार असावे : दशरथ मडावी


उमरखेड: आदिवासी संघर्षशील प्राणी आहे .संघर्षाची पाठ आदिवासींनी कधीच सोडली नाही. सुरुवातीला त्यांचा संघर्ष निसर्गाशी आला, नंतर संघर्ष करत करत इथल्या मानवी व्यवस्थेशी आला .आदिवासींवर सातत्याने अन्याय अत्याचार होत असला तरी त्यांचा संघर्ष टिकून आहे. हा संघर्ष कधीही नष्ट होता कामा नये ही संघर्षाची जाणीव आमच्या माणसांना देण्यासाठी ही संघर्ष परिषद आहे .
सामाजिक चळवळीने


एक प्लॅटफॉर्म तयार होत असतो. परंतु राजकीय शक्तीने सर्व प्रश्न मिटविले जाऊ शकतात .यासाठी स्वतंत्र अशी आदिवासींची राजकीय ताकद उभी करण्यासाठी आदिवासींनी तयार असावे असे आवाहन मा.दशरथ मडावी साहेब यांनी आदिवासी संघर्ष परिषदेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले. आदिवासींसमोर खूप सारे प्रश्न आहेत .त्यात बोगसांची घुसखोरी आहे धनगराच्या संदर्भात टाटा इन्स्टिट्यूटने दिलेला अहवाल जाहीर करावा ही मागणी आदिवासी संघर्ष परिषद करीत आहे. डिलिस्टिंग च्या रुपाने आदिवासींच्या विविध संघटना चालवणारे तसेच

कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना चालवणार्यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. हे सात्यत्याने आदिवासी विरोधी भूमिका घेतात.यांच्या भूलथापांना आदिवासींनी बळी पडू नये. धर्मांतरित आदिवासींना डी लिस्टिंग करणे म्हणजे आदिवासींमध्ये फूट पाडण्याचे काम होणार आहे .हल्ली आदिवासी स्वतःच्या धर्माची गोष्ट करायला लागलेला आहे .आम्ही हिंदू नाहीत .भारताच्या सर्व हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की आदिवासी हिंदू नाहीत. हल्ली आदिवासी वेगळ्या धर्माची गोष्ट करतोय त्यामुळे आदिवासींना

अल्पसंख्यांक करणे, आदिवासींत फूट पाडणे, आदिवासींना भय दाखवून हिंदूकरण करणे हा डाव डिलीस्टिंगच्या माध्यमातून होत आहे या गोष्टींना आदिवासींनी बळी पडू नये असे आवाहन मा.दशरथ मडावी साहेबांनी केले.परिषदेत आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात सुभेदार नारायण पिलवंड, वसंत कनाके, आदिवासी साहित्यिक, ह.भ.प.भागोराव शिरडे महाराज, भगवानजी कोकाटे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक साहेबराव कांबळे ,महासचिव ,महाराष्ट्र राज्य राजीव गांधी पंचायत संघटन विभाग हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबराव शेळके ,भाऊराव जुडे ,नागोरावजी ढोले ,उत्तमराव पांडे, दिगंबरराव मेंडके , दादाराव गव्हाळे ,वसंत भुसेवाड ,देविदास खोकले ,शेषराव जुडे ,प्रकाश शिकारे ,हरणाबाई पेजेवाड, मनीषा कर्हाळे हजर होते. प्रमुख उपस्थिती बिरसा क्रांती दलाचे राज्य अध्यक्ष ,रंगराव काळे ,राज्य उपाध्यक्ष डी.बी .अंबुरे, राज्याध्यक्ष, महिला फोरम गिरिजा उईके ,राज्य प्रशिक्षक बी.व्ही.एफ. नारायणराव पिलवंड राज्य महासचिव, किरण कुमरे, विदर्भ सचिव,प्रा. कैलास बोके, चंद्रकलाबाई भुरके ,सखाराम येवलीकर हजर होते .परिषदेचे संयोजक रमेश भिसनकार,जिल्हाध्यक्ष ,पुष्पाताई ससाने ,जिल्हाध्यक्ष,महीला फोरम,संजय मडावी, जिल्हा महासचिव, तुकाराम जुमनाके, रामेश्वर ढगे, रमेश मडावी , नागोराव गेडाम ,शिवनारायण भोरकडे, विजय काळे हे होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी भागवत काळे,मंजली साखरकर, शारदा वानोळे ,अशोक ढोले,जीवन कोवे, शंकर पखमोडे,संगित पवार,निलेश उकंडे,विलास चांदेकर,प्रविण वरखडे, आशा ढोले,शुभम चांदेकर,चंद्रकांत खंडारे, कैलास गारोळे ,संजय अंभोरे, मारोती धनवे,शांतीदास खोकले ,प्रवीण देवकर ,विजय भुसारे यांनी मेहनत घेतली. परिषदेचे संचालन जिल्हा महासचिव संजय मडावी यांनी तर आभार निलेश पिलवंड यांनी मानले. परिषदेला अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!