बिटरगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वाहिली आदरांजली

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 8 डिसेंबर) तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या बिटरगाव ( बु ) या ठिकाणी दि,6 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 8:00 वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार, विद्वतेचा धगधगता अंगारा, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, पं. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्प पूजा व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व दुःखत अंतकरणाने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित गावकरी व बौद्ध धर्मीय महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकत आदरांजली पर भाषणे करण्यात आले होते. ग्रां. पं. सदस्यां लताताई घोडगे व वदंना वाघमारे या महिलांनी सर्वप्रथम भाषणे केली. व त्यानंतर मनोहर दीप कांबळे सर व गजानन कनाके बीट जमादार बिटरगाव यांनी भाषणाच्या माध्यमातून ज्या महामानवांनी आपल्या परिवाराची, पत्नीची, मुला बाळांची, व स्वतःच्या प्रकृतीची तमा न बाळगता भारतीय संविधानाची निर्मिती करून धर्मनिरपेक्ष भारत बनवला. व बहुजनांना समतेचे न्याय,हक्क, बंधुत्वता, अधिकार मिळवून दिले. या गोष्टीची आपणास जाण असली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या एका धर्माचा विचार केला नसून संपूर्ण भारतीय बहुजनांना समतेच्या चौकटीमध्ये आणले आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतीयांचे कल्याण कारक आहेत. असे भाषणाच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित माजि उपसरपंच, कृष्णा विनकरे, ग्रां. पं. सदस्य. कोंडबाजि इंगोले, तुकेश कांबळे, दत्ता विणकरे, श्रावण मामा गायकवाड, मा. पो.पाटील. शंकर कांबळे,अशोक सावतकर, विजय कदम, विलास आढागळे, रंजना कांबळे, रत्नमाला इंगोले, यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार वसंता नरवाडे यांनी केले होते.