महागाव ते करंजखेड जाणारा पूल गेला वाहून

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात काल सतत पाऊस आल्यामुळे महागाव ते करंजखेड नाल्यावरील फुल वाहून गेल्यामुळे सहा ते सात गावाचा संपर्क तुटला आहे. महागाव कडे शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व मुलींना तसेच कॉलमेट मधील मुलांना महागाव येणे बंद झाल्यामुळे शाळा सुरू झाल्यावर मुलांची उपस्थिती न झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर पहिल्या दिवशी परिणाम झालेले चित्र पाहायला मिळाले बरेच दिवसापासून करंज खेड येथील सरपंचांनी आमदारांना वारंवार लेखी तक्रारी देऊन फुल दुरुस्त करण्याचे सूचना दिल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेऊन आमदार किसनराव वानखेडे यांनी कामाची पाहणी केली तरीदेखील ते त्या पुलाचे नियोजन करू शकले नाही महागाव तालुक्याने भारतीय जनता पार्टी किसनराव वानखेडे यांना संपूर्ण आघाडीने मतदान देऊन विजय करण्यात सिंहाचा वाटा महागाव तालुक्याचा आहे .तरीदेखील महागाव तालुक्यातील जनतेच्या तक्रारीवर विकासाचे नियोजन शून्य असल्याचे दिसून आले .अधिकाऱ्यावर कोणतेही लोकप्रतिनिधीचे वचक नसून अधिकारी मनमानी कारभार करीत आहे .महागाव मध्ये तहसील मध्ये आमदारांनी भेट दिली असता कोणतेही
अधिकारी कार्यालयात उपस्थित आढळून आले नाही. त्यांना त्यांनी नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला परंतु कोणत्याही अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अधिकारीच महागाव तालुक्याचे मालक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी कंगाल अधिकारी मालामाल महागाव तालुक्यात खर्डीच्या याद्या वेळेवर उपस्थित करून न दिल्यामुळे शासनाचा निधी वापस गेल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यासाठी किसान मोर्चा ने तहसीलदार आंदोलन सुद्धा करण्यात आली. तर लोकप्रतिनिधी काय करत आहे? खासदार नागेश पाटील यांना महागाव तालुक्याची विसर पडली आहे .याचा विचार महागाव तालुक्यातील नागरिक करीत आहे. मागील आमदार ससाने यांनी आपल्या फंडातून महागाव नगरपंचायत ला अंबुलन्स उपलब्ध करून दिली पण ती विश्रामगृहावर दोन वर्षापासून धूळ खात आहे. आपल्या फंडाचा उपयोग विकास काम करण्याकरता अपेक्षित असताना त्यांनी सुद्धा करंजखेड येथील पुलाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सात गावातील लोकांना रहदारी पूर्ण बंद झाली. दवाखाने ,शाळा ,अशा सुविधा पासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे त्यामुळे करंजखेड येथील नागरिकांनी दोन दिवसात पूल दुरुस्त न झाल्यास रस्ता रोको करण्याचे मनस्थितीत दिसून आले आहे.