टक्केवारीच्या नादात महागाव तालुका विकास कामाला ब्रेक!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात विकासाच्या नावावर सिमेंट रोड, डांबर रोड ,नाल्या व रोडवर करण्यात येणारे पुल अशी बरीचशी कामे महागाव परिसरात सुरू आहे परंतु टक्केवारीच्या नादात ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचे दिसत आहे. असे बरेच काम आहेत की ते अधुरे अधुरे असून कामाची मुदत संपल्यानंतरही ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याऐवजी मुदत वाढ देऊन कामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .टेंभी ते हिवरा रोडवरील कासारभेट गावाजवळ पुलाचे काम तसेच रोडचा ठेका ओबेराय कंपनी यवतमाळ यांनी घेतला असून त्या कामाकडे बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येते. उन्हाळ्यामध्ये धीमे गतीने काम सुरू असून पुलावरील सेंटरिंग चोरी गेल्यामुळे काम बंद असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले चोरीचा व कामाचा कोणताही संबंध येत नसून ठेकेदारांनी चोरीबाबत साधी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली नाही. असे बहाने करून ठेकेदार टाईमपास करत असल्याचे दिसून आले .तरीही टक्क्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून आले .टेंभी कसाळबेळ सेवानगर अनंतवाडी हिवरा या गावातील विद्यार्थ्यांना व मुलींना टेंभी येथे शाळेत जाण्याकरता मानव विकास ची बस चालू होती पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष नामुळे संबंधित कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नाईलाजाने ती बस नाल्याला पाणी असल्यामुळे व पुलाचे काम अधूरे असल्यामुळे कासाळबेळ येथून पलटत असल्यामुळे सेवा नगर येथील मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे .तसेच फुलसांगी पासून नागपूर माहूर जाणाऱ्या प्रवाशांना पुलाचे काम अधुरी असल्यामुळे 25 किलोमीटरचा फेरा देऊन हायवेवर यावे लागत आहे .तसेच पुलाच्या अधूरे कामामुळे तीन ते चार अपघात सुद्धा झाले आहे .कासाळबेळ येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू मस्के यांनी वारंवार बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून माहिती देण्यात आली तरीसुद्धा ठेकेदाराने मुदतीत काम न करता धीमे गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .तसेच गुज ते माळकिनी जाणाऱ्या रोडवरील तीन वर्षापासून पुलाचे काम सुरू झाले होते. पण मागील सहा महिन्यापासून काम बंद असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले तशी शोकाज नोटीस ठेकेदार यांना देण्यात आलेले सांगण्यात आले त्या परिसरातील नागरिकांना नाल्या मधून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा कामाची पाहणी आमदार साहेबांना केली पण पुढे काय ?महागाव परिसरात टक्केवारीमुळे कामाची क्वालिटी नियमाप्रमाणे होत नसून निकृष्ट दर्जाचे रोडचे काम होत असल्याचे दिसत आहे. त्यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी हे फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये या कामाची रूपरेषा दिसून आली आहे. पुलाचे अर्धवट काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा सेवानगर कासाळबेळ येथील नागरिक संबंधित विभागासमोर उपोषणाला बसण्याच्या मानसिकतेत आहे