Uncategorized

हिवरा गावठाण फिडर सतत बंद होत असल्याने जनजीवन विस्कळीत

(समस्या न सुटल्यास अनंतवाडी विज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांचा महामार्ग रोकोचा निर्णय)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


अनंतवाडी येथील वीज वितरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये मागील काही दिवसापासून गावठाण व कृषी एजी फिडरचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील कदम यांच्या नेतृत्वात परिसरातील गावकऱ्यांची दादाजी आश्रम या ठिकाणी बैठक पार पडली यामध्ये १८जुन रोजी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येवुन तसे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

अनंतवाडी या केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये एबी स्विच अस्तित्वातच नाही‌. जर एखाद्या ठिकाणी साधा तांत्रिक बिघाड झाल्यास त्याकरिता तासानं तास संपूर्ण फिडर बंद ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होत असताना काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिक या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना रात्र रात्र अंधारात राहावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक गावांमध्ये विद्युत वाहक तारा पडलेल्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. त्या दुरुस्त करणे गरजेचे असतांना, त्याकडे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. अनेक गावांमध्ये असलेल्या डीपीवरील फ्युज पेट्या उघड्या आहेत. त्यामध्ये दगडी फ्युज टाकणे आवश्यक असतांना तारांच्या साहाय्याने तो जोडल्या गेलेला असल्याने कधीही जळून विद्युत पुरवठा बंद होण्याचे नाकारता येत नाही. तसेच कृषी फीडरचा विद्युत पुरवठा मागील दोन महिन्यापासून बंद आहे‌. यावर पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या गावांमधील पाणी पुरवठा योजना बंद आहे. पाण्या अभावी शेतातील पिके करपून जात आहे. त्यामुळे गावठाण व कृषी फिडरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा १८जुन बुधवार रोजी हिवरा (संगम) येथे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेवुन तशा प्रकारचे निवेदन तहसिलदार महागाव,उपविभागीय अभियंता मराविवि, ठाणेदार पोलीस स्टेशन महागाव यांना देण्यात आले.
या निवेदनावर माजी जि.प.सदस्य साहेबराव कदम पाटील, शरद पाटील उपसरपंच, सुधाकर जामकर, प्रा.विजयराव कदम, माजी सरपंच डॉ.धोंडेराव बोरुळकर,प्रविण जामकर, राजु धोतरकर,भगवान फाळके, भगवान बोंपिलवार , चयन राठोड, पंजाब पाटील ,सिद्धांत कदम, अल्लारखा खान, अवधूत देशमुख, शेख मेहबूब, शेख यासीन, संजय सोनुने, चंद्रशेखर दावलबाजे, गजेंद्र जामकर, शरद बेलखेडे, शरद कदम, आशिष गावंडे, विलास कदम, विजय कदम, सुरेखा जाधव, समाधान कदम, विशाल हरणे, सुभाष तंबाखे, सतीश पाटील, विष्णू करमोडकर, सचिन वेरुळकर, अविनाश नरवाडे, कैलास धोत्रे, रामराव कदम पाटील, अभय बोंबीलवार, बिपिन पवार, बाबुराव कदम , कामारकर,महेश कामारकर, अवधुतराव देशमुख यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!