महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अमडापूर धरणावर होत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पेयजल योजनेचे काम प्रगतीपथावर !

( फुलसावंगी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार ! योजनेचे काम नियोजनबद्ध व अंदाजपत्रकानुसार वेळेतच पूर्ण करण्याचा बांधकाम कंपनीचा मानस ! )
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे अमडापूर धरण प्रकल्पावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत १३ कोटी रुपयांचे पेजल योजनेचे काम प्रगतीपथावर असून फुलसावंगी गांवातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे . सदर योजनेचे काम नियोजनबद्ध व अंदाजपत्रकानुसार चांगल्या तऱ्हेने चालू असून सदर बांधकाम वेळेतच पूर्ण करण्याचा मानस बांधकाम कंपनीने व्यक्त केला आहे . सदर पेयजल योजनेचे काम अमडापूर धरण येथून फुलसावंगी गांवापर्यंत जवळपास ८ .५० कि . मि . जमिनीच्या खालून पाईपलाईन टाकून फुलसावंगी येथील पुनेश्वर मंदिर नजीक मोठ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून त्यामधून संपूर्ण फुलसावंगी गावाला पाणीपुरवठा होणार आहे . महाराष्ट्र प्राधिकरण योजने अंतर्गत होत असलेले पेयजल योजनेच्या कामाचा दर्जा अत्यंत चांगला असून बांधकामाला लागणारी साहित्य संबंधित बांधकाम कंपनी उच्च प्रतीचे वापरत असल्याचे निदर्शनास आले ! फुलसावंगी येथील नागरिकांनी सदर पेयजल योजनेचे बांधकाम होत असल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे ! अशीच कामे महागाव तालुक्यातील इतर ग्रामपंचायत क्षेत्रात झाल्यास निश्चितच त्याचा फायदा ग्रामवासियांना होणार आहे ! भ्रष्टाचार मुक्त काम करण्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून या पेयजल योजनेकडे पाहावे लागेल ! सदर कामावरील मुख्य अभियंता राठोड आणि सहाय्यक अभियंता तसेच बांधकाम कंपनी यांनी योग्य समन्वय ठेवत शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीच्या आतच सदर नियोजित योजनेचे काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे . महागाव तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून फुलसावंगी गावाचा नावलौकिक आहे आणि या गावाला पाणीपुरवठा करण्याच्या शासनाच्या धोरणाचा फुलसावंगी ग्रामपंचायत सहर्ष स्वागत करीत आहे . शासन धोरण निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पेयजल योजनेला फुलसावंगी ग्रामपंचायत पाठिंबा देत काम वेळेतच पूर्ण करण्यासाठी बांधकाम कंपनीला सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे .