चौकशी अधिकाऱ्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस जारी!माजी सभापती दीपक आडे यांच्या काळात झालेल्या लेखापरीक्षण मध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे नवनियुक्त संचालकाची तक्रार!

तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे
पंजाबराव गावंडे आणि पंजाबराव खडकेकर यांनी महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या अनियमीयत्तेची चार एप्रिल 2025 रोजी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे जिल्हा उपनगंधकांनी महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविषयी चौकशी करण्यासाठी गुणवंत खडसे चौकशी अधिकारी तथा उपलेखापरीक्षक सहकारी संस्था महागाव यांना तक्रारी मधील मुद्याची चौकशी करून एका महिन्याच्या आंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या मध्ये सद्यस्थितीत बाजार समिती’ड’ वर्गात गेल्याची कारणे काय आहेत. बाजार समितीने सहावा वेतन आयोग लागू केल्या संबंधाने सादर केलेले डॉक्युमेंट्स सादर करावेत. सन 2018/ 19 पासून बाजार समितीचे उत्पन्न व खर्च बाबतचा अहवाल सादर करावा. नवीन तीन कर्मचारी नियुक्ती कशाप्रकारे केली या बाबत कागदपत्रे सादर करावेत. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगा संदर्भातील सर्व कागदपत्रे सदर करावेत. बाजार समिती परिसरात करण्यात आलेले गोडाऊन बांधकाम, वजन काटा बांधकाम संबंधाने कागदपत्रे दाखल करावेत. 2016/ 17 मध्ये बाजार समितीकडे असलेले डिपॉझिट व त्याचा झालेला विनीयोग कशा प्रकारे केला त्याचे पुरावे सादर करावेच. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून वसूल केलेला सेस व उचल केलेला ऍग्रीम बाबत माहिती उपलब्ध द्यावी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधींचा भरणा कशाप्रकारे केला या बाबतीत नोंदी सादर कराव्यात. महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे व त्याचे भाडे आकारणी व वसुली बाबतच्या नोंदी सादर कराव्यात . 2021 मध्ये बाजार समितीने केलेला अभ्यास दौऱ्या बाबत माहिती द्यावी. व्यापाऱ्याकडून वसूल रक्कम व बाजार समितीचे दप्तरांमधील नोंदी या मधील फरक नोंदी बाबत रेकॉर्ड उपलब्ध करावे. 2019 ते 22 या कालावधीमधील लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्ती बाबत सविस्तर नोंदी सादर कराव्यात. केंद्रनिहाय बाजार फी व देखरेख फी वसुली व वसुलीची पावती पुस्तके व चार कर्मचाऱ्यांतील वसुली बाबतच्या नोंदी. सहा जुलै रोजीचा बाजार समितीने गठित केलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करावा असे चौकशी अधिकारी तथा उप लेखा परीक्षक सहकारी संस्था महागाव यांनी 20 मे 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस बजावली आहे. तसेच धान्य चाळणी ज्या गोदामात बसवलेली आहे. त्यावर आवाढव्य 25 ते 30 लाख रुपये खर्च करण्यात आला परंतु शेतकऱ्याला त्याचा काही उपयोग झाला नाही. धान्य चाळणी ज्या दिवस पासून गोदामात फिट केली त्या दिवा पासून बंद अवस्थेत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कोणताही उपयोग होत नाही . सभापती व नवीन संचालकांनी लवकरात लवकर धान्य चाळणी सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.