जलजीवनाच्या कामाचा झाला बट्याबोळ?नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कसा बसवावा मेळ,

प्रतिनिधी संजय नागरगोजे
, महागाव तालुक्यात जलजीवनाच्या कामात मुरले भ्रष्टाचाराचे पाणी
प्रत्येक गाव ,तांडा ,वाडी वरील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे या उद्दिष्टाने कोट्यावधी रुपयाचा निधी महागाव तालुक्यात प्राप्त झाला. परंतु उन्हाळा संपत असताना देखील जलजीवनाचे काम न झाल्याने घरोघरी पाणी मिळणार हे मुघजळ ठरू नये अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनाचा आढाव बैठकी पार पडल्या. परंतु गाव वाडी वस्ती तांडा मधील नागरिकांना उपलब्ध पाणी मिळणे अशक्य झाले. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे माळ पठारावर तो पाण्याचा दुष्काळ पडला आहे. गावोगावी जलजीवन मिशन कामांमध्ये पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांनी मिले भगत करून अंदाजपत्रकाला तिरंजली देत अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाचे काम करून शासनाचा निधी आपल्या घशात उतरविण्याचे काम केले आहे. तर अनेक कामावर मोजमाप पुस्तके मध्ये ज्यादा कामे दाखवून जादा रखम ठेकेदारांना अदा करण्यात आले असल्याचे कारणाने उघड झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मुबलक पाणी मिळणे अशी आशा असताना अधिकारी व कंटाळाच्या मधुर संबंधामुळे ही योजना केवळ शासनाच्या निधीचा मलिदा लाटण्याचे साधन बनले असल्याने नागरिकांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. आता पावसाळ्याची सुरुवात होणार आहे. जल जीवन कामासाठी गावातील रस्ते फोडून ठेवले कामे अधुरी आहेत. ठेकेदारांना फोडलेल्या रस्त्यावर सिमेंट काँक्रीट टाकते बंधनकारक असताना देखील पाणीपुरवठा विभागाची अधिकारी त्या कामावर दुर्लक्ष करून निकृष्ट कामावर पांघरून घालत आहेत. घरोघरी तर पाणी आलेच नाही परंतु टाकीपर्यंत ही पाणी पोहोचले नाही त्यामुळे जलजीवन मिशनचे पाणी कुठे कुठे मुरल ? हा प्रश्न नागरिक कुणाला विचारणार ही मोठी समस्या बनली आहे.