Uncategorized

महागाव तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेचा वारंवार तमाशा उघड होतो आहे !

महागाव प्रतिनिधी संजू नागरगोजे

महागाव अधिकारी वर्गावर राजकीय पक्षातील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा दबाव गट असणे गरजेचे असते परंतु महागाव तालुक्यात तो दबाव गट नसल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लाड जनतेला सोसावे लागत आहेत ! आज महागाव येथे उमरखेड मतदार संघाचे आमदार किसनरावजी वानखेडे यांनी आकस्मित भेट दिली असता शासनाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक विभागाचे कर्मचारी गैरहजर आढळून आले त्यातल्या त्यात महसूल विभागातील केवळ बोटावर मोजण्याइतके कर्मचारी हजर होते तहसीलदार नायब तहसीलदार निवासी तहसीलदार आणि अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असल्यामुळे आमदारांनी आश्चर्य व्यक्त केले ! मागील आढावा बैठकीत शासकीय वेळेतच कामकाज करा असा सज्जड दम दिला असतानाही अधिकारी आमदारांना जुमानण्यास तयार नाहीत ! सुशिक्षित बेरोजगार तरूण शासकीय नोकऱ्या मिळावा म्हणून चपला झिजवत असताना शासकीय कर्तव्यावर असलेली अधिकारी , कर्मचारी मंडळी नोकरीची गरज नसल्यासारखी का वागत आहे ? हे एक न सुटणारे कोडेच आहे ! आमदार साहेबांनी प्रत्येक विभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता जवळपास बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले ! तालुक्याचे विकासासाठी तालुका अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून सर्वसामान्य जनतेची कामे गतीने व्हावी हे पाहणे आमदाराचे आद्य कर्तव्य आहे ! महागाव तहसीलदार आपल्या कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे त्यांचे इतर सहकारी अधिकारी सुद्धा कार्यालयात हजर राहत नाहीत ! परिणामी तालुक्यातून दूरवरून आलेल्या नागरिकांना काम न होताच आल्या पावली परत जावे लागत आहे ! महागाव तालुक्यातील पिंपरी , भांब , करंजखेड ,अंबोडा , शिरपूर , करंजी गुंज , पेढी , पोखरी , तिवरंग , हिवरा धनोडा , भागातील शासकीय जमिनीवरील गौण खनिजांची विल्हेवाट ठरावीक लोक लावीत आहेत ! गेल्या मदत आणखी लाभार्थ्यांना मिळाली नाही महसूलचे नायब तहसीलदार आपल्या पदाचा दुरुपयोग करून अनाधिकृत ला परवानगी देण्यात व्यस्त आहेत फुरसुंगी येथील एका उठला उपविभागीय अधिकारी यांनी परवानगी नाकारली असून त्याचे फेरफार सुद्धा रद्द केले आहेत अशा अनेक वादग्रस्त कारणांनी महागाव महसूल विभाग कायम चर्चेत राहत असतो शासनाने महागाव तालुक्यातील धरण क्षेत्रातील आणि तळ्यामधील गाळ शेतकऱ्यांना शेतीमध्ये टाकण्यासाठी मिळावा यासाठी शासनाच्या वतीने गाळ काढून शेतकऱ्याने तू घेऊन जावा अशी व्यवस्था केलीली असताना अवैध वीट कारखानदार अधिकाऱ्यांच्या मदतीने हजारो बटास सुपीक मातीचा गाळ वीट भट्ट्यांसाठी वीट भट्ट्यांसाठी जागोजागी डेपो करून ठेवत आहेत महागाव तालुक्यातील मागील काळातील शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबांना अजून पर्यंत अजून पर्यंत शासकीय मोबदला मिळाला नाही अपादग्रस्तांचा निधी शासनाकडे पडून असताना महागाव तालुक्यातील प्रकरणे निकाली काढून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ मिळणे गरजेचे आहे अशा अनेक समस्या आमदारांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या मदतीने सोडविण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक राहू शकतो अन्यथा यांना रान मोकळे आहे वर्षीची अतिवृष्टीची

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!