शेतकऱ्यांच्या समस्यांना तात्काळ मार्गी लावा भारतीय किसान संघातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

शेख मुजाहिद सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : – शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत व समस्यांवर नेहमी प्रयत्नशील राहून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कधी निवेदन तर कधी वेळप्रसंगी संविधानिक मार्गाने आंदोलन करून प्रश्न मार्गी लावणारी संघटना म्हणजे भारतीय किसान संघटना होय.ढाणकी शहरात शेतकऱ्याच्या अनेक समस्या असून जास्तीत जास्त शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस उत्पादक शेतकरी असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या समस्या मार्गी लावण्यासाठी भारतीय किसान संघटणा ढाणकी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. बऱ्याच वर्षापासून पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे व अद्याप सुरू झालेले नाही ते काम मार्गी लावण्यात यावे, सहस्त्रकुंड धरणाच्या जोडकालव्यावर त्या भागातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनाची तरतूद करून जोडलेल्या कालव्यामध्ये बारा महिने पाणी राहील याची व्यवस्था करावी, पैनगंगा नदी मध्ये कालव्याचे पाणी सोडण्यासाठी किमी 69 च्या पुढे डाव्या कालव्यास एस्केप देण्यात यावे, ईसापुर धरणाच्या डावा कालवा ढाणकीनंतर लांबी वाढवून पुढे चिंचोली, अकोली, मन्याळी ,बिटरगावच्या शेतजमिनीस सिंचनाचा लाभ द्यावा, ईसापुरच्या डाव्या कालव्याचे बांधकाम 40 ते45 वर्षांपूर्वी झाले असून तो दुरुस्त करण्यात यावा जेणेकरून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळेल, गांजेगाव साठी 33 के व्ही सबस्टेशन मागील वर्षी मागणी केली होती ते सबस्टेशन लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे, ढाणकी येथील महावितरण चा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ऊर्जा प्रकल्प मागील वर्षी पासून काम पूर्ण होऊन सुद्धा दोन सख्या कंपन्याच्या वादात बंद आहे ते चालू करण्यात यावे, तालुक्यातील पांदण रस्ते लवकरात लवकर मार्गी लावावेत. अशा विविध मागण्या भारतीय किसान संघ ढाणकी तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हा अधिकारी यवतमाळ,उमरखेड महागाव मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांना निवेदन देण्यात आल्या. या वेळी भारतीय किसान संघाचे पुसद जिल्हा कोषाध्यक्ष नितीन येरावार, भारतीय किसान संघ ढाणकी तालुकाध्यक्ष गोपालसिंह गौर, भारतीय किसान संघाचे महामंत्री दिगांबर शिरडकर, भारतीय किसान संघ उपाध्यक्ष बक्काजी रावते, बाळू शहापुरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.