संविधानिक मूल्यांच्या रुजवा – डॉ टी . जी . हापसे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : संविधानिक मूल्याची रुजवणूक केली तर लोकशाही व्यवस्था बळकट होऊ शकते असे प्रतिपादन प्राध्यापक हापसे यांनी केले ते तालुक्यातील मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे संविधान जनजागृती अभियान या अंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉ . बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र अमरावती व मिलिंद महाविद्यालय मुळावा संयुक्त विद्यमाने एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या वेळी प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ . जयमाला लाडे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा . ज्योती खंदारे आणि आयोजक प्रोफेसर डॉ . अनिल काळबांडे मराठी विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती . सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संविधान निर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले .त्यानंतर मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी ,संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रोफेसर डॉ .

काळबांडे यांनी केले , त्यामध्ये त्यांनी या कार्यक्रम घेणे मागचा विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा उद्देश काय आहे या संदर्भात माहिती दिली . तर प्रमुख व्याख्याते डॉ . हापसे यांनी , संविधानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करताना संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता व बंधुता या संविधानिक मूल्यांचे महत्त्व काय आहे . या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आणि या मूल्यांची समाजात रुजवून झाली तर भारतासारखी जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होईल असे मत व्यक्त केले . जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारत देशात सामाजिक विविधता आर्थिक व राजकीय विषमता आहे या देशाला एकसंघ बांधून ठेवण्यात संविधानाशिवाय दुसरा पर्याय नाही राज्यघटनेतील विविध तरतुदी जसे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य कार्यकारी विभाग कायदे विभाग न्याय विभाग व त्यांची कार्यपद्धती या संदर्भात सखोल मार्गदर्शन डॉ . हापसे यांनी केले . राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया व त्यामधील डॉ बाबासाहेबांचे योगदान यासंदर्भात प्रा . ज्योती खंदारे यांनी मार्गदर्शन करताना आजच्या काळातील संविधानिक व्यवस्थित समोरील आव्हाने आणि त्या आव्हानांना आपण कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे या संदर्भात मत व्यक्त केले . अध्यक्षीय भाषणात डॉ . जयमाला लाडे यांनी भारताची लोकशाही व्यवस्था व संविधान या संदर्भात माहिती देऊन आजच्या स्थितीत संविधानासमोरील संभाव्य धोके व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की व्यक्ती पूजेला महत्त्व देऊ नका संविधान कितीही चांगले असतील आणि त्याची अंमलबजावणी करणारे जर अयोग्य असतील तर संविधानाचा काहीही उपयोग होणार नाही तेव्हा सर्वांनी संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र होण्याचे आवाहन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका उबाळे आणि आभार सचिन धुळे मानले .कार्यक्रमास मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती मीनाक्षी चव्हाण सानिका उबाळे शितल बलखंडे सुहानी ढोबळे क्रांती कांबळे या विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला . (सोबत फोटो )