Uncategorized

राष्ट्रसंत गाडगेबाबा निर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे स्मृतिदिनानिमित्त भव्य बहुजन कवी संमेलनाचे आयोजन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


राष्ट्रसंत गाडगेबाबा निर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ३ ते ६ वाजता ‘राजगृह’अंबा नगर नांदेड येथे भव्य बहुजन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य बहुजन कवी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा हिराबाई वाठोरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिजाबाई गोखले, सरस्वताबाई गोखले, निराबाई गोखले यांची उपस्थिती लाभणार आहे.

 याप्रसंगी नांदेड वाघाळा महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल माननीय गौतम कवडे यांचा सत्कार तसेच लेखन, भाषण, प्रबोधन क्षेत्रासाठी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणारकर नांदेड यांना "समाजशब्द" हा पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गीत लेखन, प्रबोधन क्षेत्रासाठी शाहीर कैलास राऊत हदगाव यांना "समाजस्वर"या पुरस्काराने सन्मानित करण्यात येनार आहे. संमेलनाचे अध्यक्ष माननीय अर्जुन वाघमारे सर असणार आहेत, उद्घाटन इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर हे करणार आहेत.    या भव्य बहुजन कवी संमेलनाचे व्यवस्थापक भारत वाठोरे (कृषी अधिकारी), भालचंद्र वाठोरे राजकुमार कवडे हे असून सूत्रबद्ध संचलन महेंद्र नरवाडे सर किनवट हे करणार आहेत. बहुजन महापुरुषांचे "जीवन","आंदोलन"आणि"विचार समाजापर्यंत नेण्यासाठी साहित्याने निरंतर प्रबोधनाचे कार्य केले तरच प्रबोधनातून जागृती आणि जागृतीतील समाज परिवर्तन दिसून येईल यात गीत आणि कवितेची भूमिका ही अधिक महत्त्वाची असते यासाठीच या भव्य बहुजन कवी संमेलनाचे आयोजन केले असून या कवी संमेलनात बाबुराव पाईकराव डोंगरकडा, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप एडके किनवट, एल.जी. खंदारे वसमत, भीमराव हटकर नांदेड, जयराम धोंगडे गझलकार, प्रशांत गवळे शिवराय नगर, गौतम नरवाडे नांदेड, शिवाजीराव माने उमरखेड, अशोक हनवते सांगवी, प्रज्ञाधर ढवळे, अनु रत्न वाघमारे, आ.ग. ढवळे, नागोराव डोंगरे उमरी, प्राचार्य शामराव रोकडे उमरखेड, कैलास धुतराज, रूपाली वागरे वैद्य, चक्रधर थोरात अकोला, ज्योती पतंगराव कळमनुरी, चंद्रकांत कदम गझलकार भोकर, विनोद पाईकराव येलकी, विलास जल्हारे  परभणी, प्राध्यापक गजानन सोनवणे अमरावती, नम्रता खिल्लारे कळमनुरी, प्राध्यापक डॉक्टर पंजाब शेरे किनवट, अशोक वासाटे किनवट, रमेश मुनेश्वर किनवट, रुपेश मुनेश्वर किनवट, विलास भाऊ पाचरणे औरंगाबाद, कृष्णा भालेराव नांदेड, ज्योती इंगोले परभणी, विक्रम जाधव नायगाव, राजकुमार लोखंडे पिंगळी अशा प्रख्यात कविसह अनेक कवींनी  सहभागासाठी नोंदणी केली आहे अशी माहिती शासकीय विश्रामगृह  ,उमरखेड येथे बोलताना शिवाजी माने यांनी देऊन , बहुजन समाजातील साहित्यिकांनी आणि मित्र परिवार, सगेसोयरे सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती  माने यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!