Uncategorized

रस्त्यावरील धुळीमुळे उद्भवतोय प्रवासी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न

रहदारीच्या रस्त्यावर धुळीचा सामना करावा लागत असल्याने तसेच आरोग्य विषयक समस्या दिवसेंदिवस उद्भवत असल्याने निदान सकाळी व सायंकाळी रस्त्यावर पाणी मारण्याची तरी व्यवस्था करावी ही मा.आमदार किसनराव वानखेडे यांचेकडून जनतेची अपेक्षा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड शहरातून फेरफटका मारला असता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यातून रस्ता आहे असा प्रश्न आपसूकच पडतो कारण सुरू असलेल्या रस्त्याच्या विकास कामामुळे शहरातील तसेच शहरातून चारही दिशांना जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली बघावयास मिळते.


उमरखेड शहरात रस्ता सुधारण्याची कामे गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबून पडलेली आहेत. शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावे लागते. तर रस्त्याच्या कामासाठी अस्ता व्यस्त पडलेली गीट्टी इतर सामान यामुळे जाणे-येणे करणे म्हणजे जीवाची कसरतच आहे. उमररखेड शहरातून गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता अक्षरशः चाळणी चाळणी झालेला दिसतो या रस्त्याने अनेक विद्यार्थी ज्यामध्ये लहान लहान मुले तसेच शिक्षक वृंद असंख्य प्रवासी रुग्ण आपापली जाणे येणे करतात त्यावेळी रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे सर्वजण त्रस्त होतात नव्हे नव्हे धुळीमुळे अक्षरशः माखून जातात त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. अत्यंत काट्याच्या लढतीत विधानसभा निवडणूकीमध्ये जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निवडून आलेले आमदार मा. किसनराव वानखेडे हे स्वतः इंजिनियर आहेत तेव्हा त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून अथवा रस्त्याचे ठेके घेतलेल्या ठेकेदारांकडून रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत निदान सकाळी व सायंकाळी या रहदारीच्या रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करावी जेणेकरून

उडणाऱ्या धुळीचा सामना प्रवासी जनतेला करावा लागणार नाही आणि ठेकेदारांकडून सदर रस्त्याची कामे शक्य तितक्या लवकर उरकून घ्यावी जेणेकरून उमरखेड वासी तसेच प्रवासी जनता धुळीमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्येपासून वाचतील अशी अपेक्षा असलेली कुजबुज जनतेतून ऐकावयास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!