Uncategorized

सत्यशोधक शेतकरी संघ विधानसभा निवडणूक लढवणार !

चौकट : : “लोकप्रतिनिधीला मिळणाऱ्या मानधनावरच समाधान मानणारा उमेदवार मतदारांना पाहिजे आहे.: नितीन महेश्वरी,”
कार्याध्यक्ष सत्यशोधक संघ, उमरखेड.

चौकट :“उमरखेड – महागाव विधानसभे ची निवडणूक आता जनतेनी हातात घ्यावी” डॉ. वि . ना . कदम

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


उमरखेड :उमरखेड महागाव विधानसभा मागासवर्गासाठी राखीव असून गेल्या काही वर्षापासून या मतदारसंघाचा ज्या प्रमाण पाहिजे तसा विकास झाला नाही जनतेच्या मनात लोकप्रतिनिधीकडून खूप आशा आकांक्षा होत्या परंतु त्या पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी अलीकडच्या काळात जनतेला मिळाला नाही, आतापर्यंत अनेक पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी, खासदारांनी आणि मंत्र्यांनी केवळ आश्वासनाची खैरात केली परंतु जनतेच्या जीवन मरणाचा एकही प्रश्न सुटलेला नाही दैनंदिन जीवनातील साधे साधे प्रश्न जसे पिण्याचे शुद्ध पाणी, गुणवत्तापूर्ण रस्ते, शाश्वत वीज पुरवठा, शेतमालाला भाव, शिक्षण, आरोग्य,बेरोजगारांना रोजगार देणे, पैनगंगा नदीवर साखळी बंधारे निर्माण करणे व कॅनल चे राहिलेले उर्वरित काम पूर्ण करणे, शेतकऱ्यांसाठी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि दुग्ध पदार्थ साठविण्यासाठी एखादे शित गृह उभारणे असे अनेक प्रश्न जसेच्या तसे असून आतापर्यंतचे सर्वच राजकीय पक्ष यामध्ये अपयशी ठरले आहेत या परिस्थितीचा विचार करून मतदारांना नवा पर्याय देण्यासाठी सत्यशोधक शेतकरी संघ येणारी विधानसभा निवडणूक लढणार आहे अशी घोषणा सुज्ञ मतदाराच्या मेळाव्यात जिजाऊ सांस्कृतिक भवन उमरखेड येथे सत्यशोधक शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी विचारपिठावर अध्यक्षस्थानी नितीन माहेश्वरी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ,डॉ . वि .ना .कदम, शिवाजीराव भाऊसाहेब माने, उमाकांत मडके, भाऊराव चव्हाण, अँड विलासराव देवसरकर, यशवंत गिरी,देवानंद मोरे श्रीराम पाटील नलावडे, वड्डे सर व सत्यशोधक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. परंपरागत राजकीय पक्षाच्या फसव्या आणि लबाड राजकारणाला कंटाळलेल्या सर्व मतदारांनी नवा पर्याय निर्माण करण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी ज्या उमेदवारांनी सत्यशोधक शेतकरी संघाकडे उमेदवारीची मागणी केली आहे त्यापैकी सुशिक्षित,प्रामाणिक व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण उमेदवार निवडण्याची प्रक्रिया अल्पावधीतच पूर्ण करून पुढील रणनीती ठरविणार असल्याची सभेमध्ये ठरले आहे या सभेला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मतदार उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद पाटील मोरे यांनी तर संचलन उद्धव गायकवाड यांनी तर आभार गजानन दामोदर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!