Uncategorized

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी द्या… संध्या रणवीर

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192


महागांव/उमरखेड दी १८
मागील वर्षी व याही वर्षी सप्टेंबर महिन्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीत उध्वस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांना नुकसानभरपाई सह पीक कर्जमाफी द्या अशी मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन वजा मागणीतून संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी केली आहे
महागांव पुसद उमरखेड सह सर्व यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सारखी अतिवृष्टी झाली प्रचंड वित्त व मनुष्य हानी होऊन नुकसान झाले शेती व शेतकरी उध्वस्त झाला गावातील कच्ची घरे,गुरे,ढोरे पावसाच्या प्रवाहात वाहून गेले निसर्गाच्या या लहरी पणा मुळे परकोटीस गेलेल्या व गत वर्षांपासून अतिवृष्टी चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह

पीककर्ज माफी देण्यात यावी हे नुकसान या वर्षी नुकसानीची तीव्रता ही जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले गत वर्षीचे पीक कर्ज फेडू शकले नसून या खचलेल्या मानसिकतेतुन शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी व आत्महत्ये सारखा मार्ग अवलंबन्या पूर्वी पीक कर्ज माफी चा मदतीचा हात सरकारने द्यावा अशी मागणी संध्या रणवीर यांनी शासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!