प्रज्ञानंद खडसे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी ग्रामीण भागातील युवकांची मागणी

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात रंगत आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून युवा नेतृत्व, माजी पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. खास करून तरुण मतदारांची ही मागणी आहे. पंचायत समितीमध्ये सभापती असताना ग्रामीण भागातील समस्या काय असतात हे प्रज्ञानंद खडसे यांना चांगले माहित आहे. शासनाच्या विविध योजना पंचायत समितीमार्फत नागरिकांना पुरविण्यात येतात. त्या सुविधा गरजू शेतकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असा आग्रह त्यावेळी प्रज्ञानंद खडसे यांचा असायचा. यामुळे एक आदराचे स्थान ग्रामीण भागात त्यांच्याबद्दल निर्माण झाले आहे. त्यांचे वडील विजयराव खडसे यांनी सुद्धा उमरखेड विधानसभेचे नेतृत्व केलेले आहे. जमिनीवर पाय असलेला नेता अशी त्यांची आजही ओळख आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना प्रज्ञानंद यांच्यामध्ये निपजली आहे. ग्राउंड लेव्हल ला जन सामान्यांसाठी काम करण्याची त्यांची मानसिकता असल्याने यावेळेस काँग्रेस कडून प्रज्ञानंद खडसे यांना संधी मिळावी असे प्रत्येक ग्रामीण भागातील मतदारांना वाटत आहे. आणि त्यात वावगे सुद्धा काही नाही. उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघासाठी एक क्लिअर व्हिजन त्यांच्या डोक्यात असून संधी मिळाल्यास मतदार संघाचा कायापलट करण्याचा त्यांचा मानस आहे. धनशक्तीच्या जोरावर काही उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे चर्चा आहे. मात्र जनशक्तीसमोर धनशक्ती टिकू शकणार नाही हे सुद्धा त्रिकाल बाधित सत्य आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराला जनशक्तीची साथ मिळेल तोच उमेदवार विधानसभेमध्ये बाजी मारेल. सध्या जनशक्ती ही प्रज्ञानंद खडसे यांच्या बाजूने कौल देत असल्याने पक्ष श्रेष्ठींनी सुद्धा यावेळेस तरुण चेहऱ्याला संधी देत मतदार संघातील तरुणांच्या भावना समजून घ्याव्यात 1
अशी मागणी होत आहे.