राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी.. प्रा. मोहन मोरे

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
या महाराष्ट्र राज्याची अस्मिता टिकून ठेवणारे लोकनेते शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी असे आवाहन शिवसेनेचे उमरखेड विधानसभेचे नेते प्रा. मोहनराव मोरे यांनी केले.
आज शिवसेना पक्षप्रमुख व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उमरखेड शहरात आज सकाळी वृक्षारोपण करून मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच शहरातील स्थानिक लघु उद्योग व्यवसायिकांना रस्त्यावर आपली दुकाने थाटावी लागतात. ऊन वारा पाऊस अशी परिस्थिती असते त्यामुळे शहरातील लघु व्यावसायिकांना आज प्राध्यापक मोहणराव मोरे यांच्या हस्ते मोठ्या व्यावसायिक छत्र्यांचे वाटप करण्यात आले तसेच हनुमान मारोती मंदीराचा हॉल मध्ये १२१ रुग्णानी रोग निदान शिबीरामध्ये लाभ घेतला व
यावेळी पुढे बोलताना मोरे म्हणाले की राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. अनेक योजना केवळ विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घोषित केल्या मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा सवाल महाराष्ट्र राज्य सरकारला असून त्यांनी विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा शेतकरी त्यांना माफ करणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. युवराज मोरे युवा कार्यकर्ते , शिवसेनेचे उपजिल्हा संघटक डॉ.अजय नरवाडे तालुकाप्रमुख सतीश नाईक शहरप्रमुख गजानन ठाकरे संतोष कलाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एड. बळीराम मुटकुळे डॉ. विश्वनाथ विनकरे , बंन्टी गीरी , माजी उपजिल्हा प्रमुख कैलास कदम , माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे, अशोक तुमावार नितीन शिंदे सुरेश कल्याणकर , वसंत देशमुख प्रसिद्धी प्रमुख यांच्यासह शेकडो शिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.