अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या… संध्या रणवीर

महागाव प्रतिनिधी
महागांव दि. ०१ सप्टें महागांव पुसद उमरखेड सह सर्व यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले व होत आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मेल पाठवून संध्या संदेश रणवीर, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडी महागांव यांनी निवेदनात तुन केली आहे.

सर्वदूर पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे गाव खेडे शहरात पाणीच पाणी आहे घरे,गुरे,ढोरे, पाळीव प्राणी शेतातील उभे पीक ही आताही पाण्यात आहे व पाण्याचा प्रकोप वाढत आहे ह्यावरून नुकसानीची तीव्रता ही जास्त असून सटेलाईट च्या आधारे अतीवृष्टीचा इशारा ही प्रशासनाने दिला आहे. संपूर्ण उमरखेड महागांव पुसद तालुक्यासह सर्व जिल्ह्याचा नुकसानीचा पंचनामा संबंधित यंत्रणेकडून करून जनस्वास्थ्यांसाठी तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंबंधात कार्यवाही करावी अशी मागणी संध्या रणवीर यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना केली आहे.