सामाजिक कमाची दखल घेऊन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाकडून महाराष्ट्र रायझिंग पुरस्काराने गौरविण्यात आले.

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
नवी मुंबई येथील कोर्ट यार्ड मेरिट या ठिकाणी पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सिने अभिनेते सयाजी शिंदे तसेच सिने अभिनेत्री कल्पना सैनी, दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक मुकेश शर्मा, दैनिक देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तथा गर्जा महाराष्ट्र चैनल चे मुख्य संपादक अनिल महाजन, गायिका दिपाली देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते निस्वार्थ इच्छाशक्ती च्या जोरावर कोणतेही काम अवघड नसतात सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते.
जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते.
सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या महिला शिवमती सरोज देशमुख यांनी विविध कार्यामध्ये सामाजिक जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी समाज व्यवस्थेमध्ये अनेक समाजसुधारक येतात आपले कार्य करतात आणि समाजाला दिशा देऊन जातात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजालाही काही देणे लागते या विचारधारेतून या प्रेरणेतून शिवमती सरोज देशमुख यांनी यवतमाळ जिल्हा पिंजून काढला मग दारूबंदीचा प्रोग्राम असो की महिला अत्याचाराविरुद्ध उचलणारा यलगार असो की टाकळी रोडचा बहुचर्चित प्रश्न सोडवण्यासाठी जेलमध्ये जाण्यापर्यंतचा प्रश्न असो सामाजिक कामात स्वतःला एवढं ओढून देतात ही वेळप्रसंगी जेल ही स्वीकाराला तयार राहतात अशी सामाजिक दातृत्वाची भूमिका निभवणाऱ्या शिवमती सरोज ताई देशमुख यांना ग्रामीण पत्रकार संघाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे पाडावर जाऊन बंदी भागात जाऊन गोरगरिबांच्या समस्या ह्या आपल्या समस्या समजून त्या समस्याला तत्कालीन राज्यकर्त्यांसमोर वाचा फोडून त्यांना न्याय देण्यास भाग पाडणाऱ्या वेळप्रसंगी रुद्र रूप घेऊनही त्या गोरगरिबाच्या भल्यासाठी लढणाऱ्या शिवमती सरोज देशमुख कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्का आपल्या माथ्यावर न लावता सामाजिक चळवळीतून ही कामे समाज व्यवस्थेला अनुरूप कामे करता येतात याचे प्रतिबिंब म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सामाजिक कार्यकर्त्या शिवमती सरोज देशमुख?
शरीर कार्यरत असले म्हणजे ते निरोगी राहते,
मन कार्यमग्न झाले म्हणजे त्याला दुःखाचा विसर पडतो,
कार्य निरपेक्ष असले म्हणजे सहकार्य लाभते,
सहकार्य आणि स्वावलंबन यांच्यामुळे निर्माण झालेल्या शक्तीपुढे संकट कितीही मोठे असले तरी त्याचा टिकावं लागत नाही…?2001 मध्ये आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्या साठी प्रियदर्शनी इंदिरागांधी शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून 5 वि ते 10 वि मराठी मीडियम ची शाळा सुरू केलीत्या रोपाचा आता वटरुक्ष झाल त्या माध्यमातून आम्ही 2012 साली उमरखेड येथे देशमुख महाविद्यालयाची स्थापना केली दारुबंदी , महिलांचे व समाजातील इतर प्रश्न सोडवणे व समाज उपयोगी अनेक उपक्रम घेतले.नंतर सकाळ तनिष्का समूहाच्या माध्यमातूनही काम केले तसेच 2017 मध्ये पाणी फाउंडेशनच्या कामात सहभाग घेवुन हीरीरीने तालुक्यातील कामे केली. प्रबोधनाचा कार्यक्रम घेतले महिलांचे सक्षमीकरना सोबत अनेक समाज उपयोगी कामात सर्वांच्या साह्याने काम करत आहे भाग घेते अन्याय होईल तेथे सर्व सहकाऱ्यांचा साह्याने वाच्या फोडण्याचा प्रयत्न करते जिजाऊ ब्रिग्रेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभर समाजा साठी काम केले गरजू महिलांना रोजगार बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या जिजाऊ ब्रिग्रेड च्या प्रदेश सहसचिव म्हणून काम करत आहेप्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून बचत गटा मार्फ़त महिलाना आर्थिक सामाजिक प्रबळ करण्याचे काम चालू आहे भविष्यातही समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रगती साठी जमेल ते प्रयत्न करण्याची महत्वाकांक्षा आहे.