उमरखेड बस स्टैंड येथे पोफाळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची बस आलीच नाही

(विद्यार्थ्यांचे झाली हालचे बेहाल)
सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड (दिनांक २ ऑगस्ट)
उमरखेड बस स्टॅन्ड वरून पोफळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची दररोज सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान असणारी एसटी बस आठ वाजेपर्यंत आलीच नाही.
त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे हालचे बेहाल झालेली दिसून आले.
शाळकरी विद्यार्थ्यांना बस डेपोतील चौकशी विभागातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा उडवा उडीचे उत्तर देऊन विद्यार्थ्यांना अजून परेशानी टाकुन त्यांना सायंकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत थांबून ठेवले आणि म्हणत होते की, आत्ता दहा मिनिटात, पंधरा मिनिटात बस येणार आहे.
त्यामुळे ही शाळकरी विद्यार्थीसाठी दुसरे कोणतेही कोणतीही एसटी बस उपलब्ध करून दिली नाही.
पाणी पाऊस सुरू झाल्यामुळे सर्व शाळकरी विद्यार्थी बस स्टॉप मध्ये थांबले होते.
ही गोष्ट पोफळी कारखानाचे माजी सरपंच आनंदराव बरडे साहेब यांनी पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांना फोन करून तात्काळ एसटी स्टँडवर बोलावून घेतले. आणि सिद्धार्थ दिवेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी बोलून दहा मिनिटात बस उपलब्ध करून दिली.
यावेळी आनंदराव बरडे, धम्मदीप लोमटे, योगेश खंडाळे कलमुळा,सीमा सोळंके,सुलताना शेख अली, आम्रपाली ढोले, किसन देशमाने तरोड, तुकाराम जाधव पोफाळी, अक्षय पुरी, बालाजी तालंकर, दत्तराव खंडाळे कळमुला, भोकरनाबाई खंडाळे, बाळू चौधरी इत्यादी अनेक शाळकरी विद्यार्थी वर्ग तसेच प्रवासी हे बसची वाट बघत होते.